सातारा जिल्हा बँकेच्या पंच्याहत्तरी निमित्त डॉक्युमेंटरीसाठी लाखोंचे उड्डाण…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जिल्हा बँकेच्या पंच्याहत्तरी निमित्त डॉक्युमेंटरीसाठी लाखोंचे उड्डाण…..
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या अजिंक्यतारा पायथ्याशी पंच्याहत्तर वर्षांपूर्वी सातारा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हे रोपट उभे केले. आज त्याचा वटवृक्ष झाला असून महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. याचा सार्थ अभिमान नक्कीच संचालकांना आहे.
आज पंच्याहत्तरी साजरी करताना अनेक गोष्टींची आठवण येत असली तरी चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जाव्या .यासाठी डॉक्युमेंटरी तयार केली जात आहे यासाठी लाखो रुपयाची यंत्रणा सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीत राबत आहेत .फार पूर्वी सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक मंडळाचे लोक व शेतकरी येत होते. त्यांचा पोशाख हा धोतर, गांधी टोपी, सदरा, लेंगा अशा पद्धतीने होता .कधी एस. टी.बसने तर कधी जीप ,मोटर सायकलने बँकेत येणारे संचालक सामान्य शेतकऱ्यांनी पाहिलेले आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब किसनवीर आबा यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा बँकेने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी ही अर्थवाहिनी उभे केली. आज सर्वसामान्य शेतकरी या बँकेत दिसत नसले तरी शेतकऱ्यांची मुले या बँकेमध्ये सेवा देत आहेत .एवढेच नव्हे तर शासकीय सेवेची संधी असताना सुद्धा अनेकांनी जिल्हा बँकेत आपली सेवा देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. याबाबत बँकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना या निमित्त धन्यवाद देणे. हा त्यांचा अधिकार आहे. सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत विकास सेवा सोसायटीमधून ज्यांचा नावाचा ठराव केलेला आहे. अशा सभासद मतदारांची चांगलीच चांदी झाल्याचे अनेकांनी पाहिले आहे. अगदी आठ दिवस नव्हे तर तब्बल पंधरा दिवस या सभासदांना सहलीच्या नावाने त्यांचा सुखकर प्रवास झालेला आहे. आणि यानिमित्त केलेल्या गमतीजमतीमुळे आता अशांना माना सुद्धा खाली घालाव्या लागत आहे. हे आता चर्चेवरून पुढे आलेले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वत्र नूतनीकरण, सुशोभीकरण यासाठी आडकाठी अथवा दुष्काळाचे कारण न सांगता सढळ हस्ते खर्च करण्यात येत आहे. अगदी रिझर्व बँक ऑफ इंडिया पासून नाबार्ड बँक यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असल्यामुळे याबाबत फारसं उल्लेख करणे उचित ठरणार नाही. याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे इमारत नूतनीकरण व अत्याधुनिकरण वेगाने सुरू आहे. याला जोड म्हणून लाखो रुपये खर्च करून सध्या डॉक्युमेंटरी तयार केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्याची मुलं कुठेही दिसत नसली तरी मोठमोठ्या कंपनींना कंत्राटी देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे का? हे शोधणे गरजेचे आहे .
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीमध्ये अत्याधुनिक यंत्रणा, कॅमेरे, ट्रॉली येऊन धडकले आहेत. किमान कोट्यावधी रुपये तर निश्चित खर्च होणार आहे. पण, होऊ द्या खर्च… बँक भक्कम आहे. आता या डॉक्युमेंटरी मध्ये संचालकांनी परदेशी वारी करून जे शेती बद्दल आधुनिक माहिती घेतलेली आहे. त्याचा समावेश होणार का नाही? हे डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर कळणार आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा टाहो, अनेक शेतकऱ्यांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागलेले आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज बाजाराला कंटाळून आत्महत्या सुद्धा केलेली आहे. एवढेच नव्हे तर काहींच्या विमा न मिळाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई सोडा पण साधी चौकशी करण्याची सौजन्य जिल्हा बँकेने दाखवलेले नाही. अशी तक्रार खटाव तालुक्यातील डांबेवाडी येथील द्राक्ष बाग उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. याला आता दीड वर्षे झालेले आहेत .अशा अनेक घटना आहेत .पण याचा आता डॉक्युमेंटरी मध्ये समाविष्ट नक्कीच होणार नाही. कारण दिसतं तसं काही नसतं म्हणून तर जग फसते. या न्यायाने जर पाहिले तर आता जिल्हा बँकेचे डॉक्युमेंटरी ही जरी कौतुकाचा विषय असला तरी जर त्याबाबत शेतकरी संघटना व शेतकऱ्यांना काही आक्षेप नोंदवलेले नाहीत. तरी ही मोठ्या मनाने शेतकऱ्यांकडून एक एक रुपया गोळा करून डॉक्युमेंटरी तयार करावी. यासाठी अनेक जण सहकार्य करतील अशी माहिती शेती तज्ञांनी दिली आहे. दरम्यान याबाबत जिल्हा बँकेत माहिती विचारले असता नेहमीप्रमाणे माहिती देण्यास जाणीवपूर्वक काय केला असेल हे शेतकऱ्यांचेही लक्षात आले .