सातारा:-पाच हजार ऐवजी दहा हजार मराठा कार्यकर्ता उद्योगी बनवा – श्री नरेंद्र आण्णासाहेब पाटील.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
पाच हजार ऐवजी दहा हजार मराठा कार्यकर्ता उद्योगी बनवा – श्री नरेंद्र आण्णासाहेब पाटील.
सातारा दि: माथाडींचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी अर्थसहाय्य करावं म्हणून वेगळ्या महामंडळाची मागणी केली होती. आज ही मागणी पूर्ण झाली असून मराठा शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण होत आहे ही आनंदाची बाब असून 5000 ऐवजी दहा हजार मराठा कार्यकर्ता उद्योगी बनवा हे स्वप्न आमचे सहकारी विजय शेलार व इतर बांधवांच्या मुळे पूर्ण होईल असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सातारा येथे केले.
पुणे बेंगलोर हायवे जवळील खेड हद्दीमध्ये सह्याद्री ऑटो यांच्यावतीने आज मराठा समाजातील लाभार्थी विजय पिसाळ यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कर्ज पुरवठा करून ट्रॅक्टरचे वितरण करताना ते बोलत होते. महामंडळाच्या वतीने १३९२ लाभार्थीना २२० कोटीची कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. असे ही त्यांनी सांगितले.
या वेळेला सातारा जावली चे शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा कृषी अध्यक्ष भाग्यश्री पवार फरांदे, माजी सभापती वसंतराव मानकुमरे ,शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, हणमंत चवरे- पाटील,सातारा जिल्हा बँकेचे व्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र सरकाळे, अरुण यादव, राजेंद्र राजपुरे, ॲड. शिवाजीराव मर्ढेकर,एस्कॉर्ट ट्रॅक्टर व्यवस्थापक जितेंद्र गुप्ता, अजित जगताप,रविंद्र परामणे ,जयवंत भोसले, हिंदुराव तरडे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार,मयूर घोरपडे, तुषार पाटील, आण्णासाहेब काटकर, विष्णू खताळ, तानाजी शिर्के, प्रकाश परामणे , संतोष शेलार आदि मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार आले त्यावेळेला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची रास्त भूमिका घेतली होती. त्यामुळे मराठा समाजाला आता आरक्षण मिळणे सोपे झालेले आहे. सर्व जाती-धर्माची मते मिळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून आला तरी विधिमंडळात मी मराठा असल्याचा अभिमान आहे असेही ते छातीठोकपणाने सांगतात त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण व उद्योजक बनवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे .शेतकऱ्याची निगडित असलेल्या एस्कॉर्ट चे ट्रॅक्टर चे वितरण करताना विजय शेलार यांनी समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांना सवलत द्यावी. कारण, आपल्याच मराठा समाजातील काही वितरकांनी सवलत देण्यास नकार दिला होता. पण, श्री शेलार यांचे मन मोठे असून त्यांच्यामुळेच अनेक मराठा शेतकरी उद्योजक बनतील असे श्री नरेंद्र पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी वसंतराव मानकूमरे, सदाशिव सपकाळ यांनी ही मार्गदर्शन केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सध्या मराठा समाजामध्ये जनजागृती झालेली असून आरक्षणाचा प्रश्न निकाली निघण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. सातारा आणि जावली हा माझा मतदारसंघ असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी संपूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. वसंतराव मानकुमरे ,विजय शेलार यांची मला साथ लाभत आहे. श्री मान कुमरे हे कलाकार असून सर्व गोष्टी जुळवून घेतात.असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळेला नाचणी उत्पादन करणाऱ्या आसणी गावातील ग्रामस्थांचाही सत्कार करण्यात आला. या सह्याद्री ऑटो या ट्रॅक्टर विक्रेत्याच्या शुभारंभ निमित्त झालेल्या या कार्यक्रमाला सातारा, कोरेगाव, जावली, खंडाळा, खटाव, वाई, फलटण परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन पत्रकार शशिकांत गुरव यांनी केले.जयदीप शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संजना शेलार ,विजय शेलार, कविता जगताप,धनश्री विवेक शेलार ,मनाली विशाल शेलार, समिंद्रा जाधव, नलिनी जाधव,योगेश बाबर, दिप नवले, अभिनव सिंग, मारुती चिकणे, श्रीहरी गोळे, मच्छिंद्र शिरसागर, कर्मचारी वर्ग, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————-
फोटो -सह्याद्री ऑटो मध्ये जिल्हा बँकेच्या अर्थसाहयातून ट्रॅक्टरचे वितरण करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप सातारा)