वैजापूर:-वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा.
प्रतिनिधी.
वैजापूर तालुक्यात उशिरा झालेला पाऊस, पावसातील खंड तसेच तालुक्यातील लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठाची स्थिती पाहता हे वैजापूर दुष्काळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. शासनाने राज्यातील दुष्काळी तालुक्यांची घोषणा केली असून या यादीत वैजापूर तालुक्याचा समावेश झालेला नाही. ७ ऑक्टोंबर २०१७ च्या अध्यादेशानुसार दुष्काळ जाहीर तसेच तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी जे पाणी प्रजन्यमापक बसवले आहे त्या प्रजन्यमापक का दहा ते पंधरा गाव एका प्रजन्यमापक केंद्राला समाविष्ट आहेत कारण प्रजन्यमापकावर पाऊस पडला आणि बाकीच्या गावांवरती पाऊस पडलाच नाही त्या बाकीच्या गावांची नुकसान झाले आहे. असेच काही बाबी लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे करावे आणि शासनाला रिपोर्ट कळवावा कारण की शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्य शासनाच्या निकषानुसार कृषी विभागाने सर्व टक्केवारी राज्याला दिली आहे परंतु 22 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबर पर्यंत सरासरी जास्त पाऊस एकाच वेळी झाला आहे परंतु तो पाऊस झाल्याने सर्व वडे नाल्यांना पाणी वाहून गेलं. आणि वैजापूर तालुका दुष्काळ घोषित करावा शेतकऱ्यांच्या शेतामधील पिके पावसाअभावी जळून या करपून गेले आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय
दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्या आधारे उपलब्ध माहिती व आकडेवारीवरून राज्यात दुष्काळ तालुक्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेताना वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.
खंड पडल्यामुळे खरिपातील मका, कापूस या सोयाबीन मग तुर इत्यादी पिकांचे उत्पन्नात मोठी घट झाली आहे. तालुक्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये पाण्याचा थेंबही नाही, यावरूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर्षी वैजापूर तालुक्यांची पाण्याची टक्केवारी ही 40% पेक्षा कमी झाली आहे. वैजापूर तालुक्यातील सध्या परिस्थितीचा शेतकऱ्यांची चिंताजनक झाली आहे वैजापूर तालुका दुष्काळी घोषित करावा.
वैजापूर तालुका दुष्काळ जाहीर करा येणाऱ्या 12.11.2023 पर्यंत दुष्काळ जाहीर करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष दादासाहेब वाल्मीक तांबे यांच्या वतीने व समस्त शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येईल राज्य सरकारला इशारा.