वाई दि.17 मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR
वाई दि.17
मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा.
वाई दि.१६/०९/२०२३ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.मदन दादा भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यास वाई तालुक्यातील १९६२ मध्ये झालेल्या चीनच्या तसेच १९७१ मध्ये झालेल्या पाकिस्तान युद्धात सहभागी झालेले वाई तालुक्यातील माजी सैनिक, तसेच वाईत राहणारे व देशसेवेतून निवृत्त झालेले माजी सैनिक सहभागी झाले होते. हा सन्मान सोहळा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेविका कु. रसिका व्याहळीकर हिने तयार केलेल्या मातीच्या कलशात माजी सैनिक, संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, एन एस एस चे स्वयंसेवक, एन सी सी चे छात्र, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांनी कृष्णा नदीतील पवित्र माती सन्मानाने कलशात एकत्रित केली. हा पवित्र कलश दिल्ली येथे जाणार असून; मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत दिल्ली येथे देशसेवेसाठी प्राणपणाने लढलेल्या आजी-माजी सैनिकांचे सन्मानार्थ भारत सरकारच्या वतीने अमृत वाटिका नावाने भव्य बागेची निर्मिती केली जाणार असून; त्या बागेसाठी या मातीचा उपयोग होणार आहे. माजी सैनिकांच्या सहभागाने वातावरण देशप्रेमाने भारावून गेले होते. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तदनंतर माजी सैनिकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि एक आंब्याचे झाड देऊन करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे ,राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ. समीर पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ.संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, एन एस एस चे सल्लागार डॉ सुनील सावंत, दुसरे सल्लागार डॉ चंद्रकांत कांबळे, डॉ. ज्ञानदेव झांबरे,डॉ. विनोद वीर महाविद्यालयातील प्राध्यापक , राष्ट्रीय छात्र सेनेचे व राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयातील विद्यार्थी, वाई तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील शिंदे साहेब, कर्नल आर डी निकम सैनिक बँकेचे संचालक श्री शामराव राजपुरे,श्री राजेश तरटे साहेब, तसेच तालुक्यातील माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना श्री. शामराव राजपुरे यांनी “माजी सैनिकांना बोलावून घेऊन,त्यांचा सन्मान येथे केला. त्याबद्दल मी सर्व माजी सैनिकांच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांचे मनापासून आभार व्यक्त केले. देशाप्रती असणारी श्रद्धा जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयमध्ये आम्हास दिसून येते. आपण जिथे काम करू तिथे इमानेइतबारे काम केले तर ती देशसेवाच आहे”. असे उद्गार काढले .माजी सैनिक श्री तरटे यांनी “कृष्णा नदीतील माती आम्ही त्या कलशामध्ये टाकलेली आहे आणि तो कलश दिल्ली येथे जाणार आहे. ही आम्हा सैनिकांना अभिमानाची बाब आहे” असे सांगून सैनिकांचा सत्कार केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, “प्रत्येकाने सैनिकाचा सन्मान केला पाहिजे. सैनिक कठीण परिस्थितीत काम करीत असतात. सैनिकांमुळेच देश सुरक्षित आहे. त्यामुळे ते खरे देशाचे सेवक आहेत”.असे गौरव उद्गार काढले. मा. मदनदादा भोसले म्हणाले की,” देशातील पहिल्या सैनिक स्कूलचा मी विद्यार्थी आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षण घेत असताना सैनिक स्कूलचे प्राचार्य कर्नल पुरी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेतले. जीवनाच्या रंगमंचावर सगळ्याच भूमिका आपण साकारू शकत नाही म्हणूनच “जय जवान जय किसान” हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी किसन वीर महाविद्यालयांमध्येच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी बरोबर एक वर्षानंतर हातात मेणबत्ती पेटवली. किसन वीर कारखान्याचा चेअरमन असताना २६/११ मध्ये शहीद झालेल्या शहिदांचे देशातील सर्वात मोठे स्मारक उभे केले. याप्रसंगी दादा पुढे म्हणाले की, माजी सैनिकांना माझ्याकडून सर्व ती मदत व सुविधा पुरवल्या जातील . कृष्णेची सुपीक माती देशाचा सन्मान वाढवण्याचे निश्चित कार्य करेल”. कॅप्टन डॉ समीर पवार यांनी माजी सैनिक सत्कार यादीचे वाचन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अरुण सोनकांबळे यांनी केले तर डॉ.अंबादास सकट यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज शिंदे, गजानन जाधव, कनिष्ठ लिपिक जितेंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास एन एस एस चे स्वयंसेवक, एन सी सी चे छात्र, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.