श्रीरामपूर :-श्रीरामपुरातील रेल्वे लाईन जवळील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष 9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष 9921180022
श्रीरामपुरातील रेल्वे लाईन जवळील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण.
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते शिरसगाव हद्दीतील रेल्वे लाईन दोन्ही बाजूने शहरातून जाणाऱ्या मार्गावरील 15 हजार व्यावसायिक रहिवाशा मध्ये घबरारीचे वातावरण निर्माण झाले आहे पुर्वीच्या जागी असलेला रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे लाईनचे दुहेरीकरणाचे तसेच हदीचे दोन्ही बाजुने मोजमाप सुरु केल्याने शाहरामध्ये संताप व्यक्त होत आहे
अनेक रहिवाशांनी दोन्ही बाजुने लाखो रुपये देवून घर, व्यापारी गाळे ५० वर्षापुवी विकत घेतले. शहराच्या विकासाला हातभार लावला. शासनाने शहरात निर्वासितांचा गुरुनानक मार्केट मध्ये व्यवसायाकरीत नाममात्र भाडेतत्वावर गाळे देवून त्यांनाही मुख्य प्रवाहात आणले. शहरात सर्व काही सुरळीत चालले असताना रेल्वे लाईन सेंट्रल पासुन उत्तरेकडील १२५ फुट तर दक्षिणेकडे ९१ फूट जागा रेल्वे प्रशासण ताब्यात येणार असे समजले आहे यामुळे अनेक जणांचे घरे दुकाने गाळे जावुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असुन ते बेघर होतील अशी धास्ती निर्माण झाली आहे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात उद्रेकाला सामोरे जावे लागेल शहरातील १५ हजार राहिवाशी व्यावसायिक व्यापाऱ्यांच्या मतावर निवडुन येणाऱ्या माजी नगराध्यक्ष आजी माजी आमदार खाजदार जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकारी यांनी रेल्वे प्रशासन राहिवासी व्यापरी यांची संयुक्त बैठक घेवुन निर्माण झालेले भितीचे सावट दुर करून त्यांनी त्यांची या विषयाची भूमिका स्पष्ट करावी. विस्थापित होऊ पाहणाऱ्या सर्व शाहवासी छोटे व्यावसायिक व्यापारी यांची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्व पक्षीय बैठक घेण्यात येणार आहे.