पुणे निगडी:-मुख्यमंत्र्यांनी दिलेली शिधापत्रिकाधारकांची ‘‘दिवाळी भेट’’ गेली कुणीकडे?
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मुख्यमंत्र्यांनी दिलेली शिधापत्रिकाधारकांची
‘‘दिवाळी भेट’’ गेली कुणीकडे?
निगडी, दि. 21 (शफिक शेख):- माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी निमित्त शिधापत्रिकांधारकांसाठी जाहीर केलेली दिवाळी भेट अजूनपर्यंतही शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचलेली नाही. आज वसूबारस उलटून गेला तरीही शिधावाटप दुकानदारांकडे दिवाळी भेट म्हणून जाहीर केलेले 1 किलो रवा, 1 किलो डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पाम तेल पोहोचलेली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना राज्यातील शिधापत्रिकाधरकांची झाली आहे.
याबाबत आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांनी निगडी, चिंचवड, आकुर्डी येथील विविध शिधावाटप दुकानदारांची भेट घेवून त्यांना याबाबतीत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांना सर्व परिमंडळ विभागांकडून दिवाळी भेटीचे कीट लवकरच मिळण्याचे मॅसेजेस आलेले आहेत परंतु अजूनही त्या किट्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसल्याने ते शिधापत्रिकाधारकांना त्या किट्सचे वितरण करू शकत नाहीए. नागरिक वारंवार येवून त्यांच्याकडे चौकशी करत असल्याने त्यांनी त्यांचे दुकानही बंद ठेवले आहे.
मा. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवाळी भेटीची घोषणा केल्यानंतर नागरिकांमध्ये एक आनंदाचे वातावरण होते. परंतु दिवाळी सुरू झाली असतानाही अजूनपर्यंत त्यांना ते अन्नधान्य मिळाले नसल्याने त्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. साधारणतः शिधावाटप दुकानदारांना अन्नधान्य वितरण करण्यासाठी एका आठवडयाचा कालावधी लागतो. परंतु अजूनही अन्नसाठा उपलब्ध झाला नाही. दोन दिवसांमध्ये अन्नधान्य उपलब्ध होईल असे दुकानदारांना संबंधित परिमंडळ अधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर अन्नपुरवठा झाल्यानंतर त्यानंतर किती दिवसांत नागरिकांना त्यांचे वाटप करता येईल त्यामुळे भरपूर गर्दी होण्याची आणि त्या गर्दीत काही अनिष्ट होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
तरी याबाबतीत संबंधित परिमंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांनी योग्य ती उपाययोजना करून दिवाळी होण्याआधी नागरिकांना अन्नधान्य वाटप करावे अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.