ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-सातारा जिल्ह्यात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी आंदोलनकर्त्यांनी ही साजरी केली एकसष्ठी,,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

सातारा जिल्ह्यात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी आंदोलनकर्त्यांनी ही साजरी केली एकसष्ठी,,,,

सातारा दि: सातारा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी सातारा जिल्ह्यामध्ये उपोषण, आत्मदहन, आंदोलन ही परंपरा कायम राहिली आहे . पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. परंतु, यामध्ये दोन आंदोलनकर्त्यांनी अंगावर ज्वालाग्रही पदार्थ अंगावर टाकले पण, दक्ष पोलिसांनी पाण्याचे फवारणी करावी आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले. एका आंदोलनकर्त्या युवतीला पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले .त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ही. एकसष्ठी साजरी केली.स्वातंत्र्य दिनी आंदोलन करताना पारतंत्र्यांमध्ये असल्याचा अनुभव घ्यावा लागला. अशी आंदोलनकर्त्यांनी टीका केली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये धरणग्रस्तांचे पुनर्वसन ,अनाधिकृत बांधकाम, महार वतन मिळकत, खाजगी कंपनीकडून थकीत रक्कम मिळणे, बँकेकडून झालेली फसवणूक, तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवत नाही, बोगस गट ,वीट भट्टी प्रदूषण, वारस नोंदी, मृद व जलसंधारण विभाग अनुकंपा तत्त्वावर सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट असून नियुक्त न करणे, पतसंस्थेची मधून झालेली फसवणूक, रस्ता खुला करणे, पीक नुकसान भरपाई मिळणे, बाबत गुन्ह कागदपत्र गायब झाल्याबाबत, कृषी अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करणे, अतिक्रमण हटवणे, शासकीय रुग्णालयासमोरील टपरी हटवणे , स्मशानभूमीच्या रस्ता, दिव्यांग विविध मागण्यासाठी, पोलीस खात्याकडून होणारा त्रास अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते.
सर्वाधिक आंदोलनाची व्याप्ती ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होती. त्याच बरोबर सहकार आयुक्त पुणे, मंत्रालय ,जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार कार्यालय ,सहकार आयुक्त कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, भूमी अभिलेखा कार्यालय अशा विविध ठिकाणी तसेच आंदोलन उपोषण व आत्मदहनाचा इशारा दिला होता. सातारा जिल्ह्यातील ९३ लोकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यापैकी ७३ लोकांनी तो रद्द केल्याचे देखील कळवले. तसेच५९ उपोषणकर्त्यांपैकी ३६ लोकांनी ते रद्द केले. २३ आंदोलनापैकी ५ लोकांनी ते रद्द केले. बाकी इतरांनी या आंदोलनाबाबत नेमकं काय केले ? हे समजू शकलेले नाही.
वास्तविक पाहता भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र आनंद उत्सव साजरा होत असतानाच काहींनी रास्त मागणीसाठी केलेले आंदोलन वगळता इतर काही आंदोलने ही व्यक्तिगत पातळीवर असल्याची माहिती मिळाली आहे. काहींनी सातारा जिल्हा पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाला वेठीस धरल्याचे दिसून आले आहे. .सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह करून सत्य जनतेसमोर मांडणे. असा त्याचा अर्थ असून अशा आंदोलनाला भारतीय लोकशाहीमध्ये पाठिंबाही मिळत आहे.
व्यक्तिगत लाभासाठी काहीजण संघटना व जातीचा वापर करून आंदोलन शब्दाला बदनाम करत आहेत .त्यांनाही ज्यांचे नाव गोवण्यात आले. अशा व्यक्तींना वकिलामार्फत नोटीस देऊन प्रत्युत्तर दिलेले आहे. मुळातच सार्वजनिक हितासाठी पूर्वी उपोषण, आत्मदहन व आंदोलन केले जात होते. आता मी सांगतोय तेच खरे…. असे समजून आंदोलन होत असल्याने अशी आंदोलने आता एक चेष्टेचा विषय झालेली आहेत. सातारा जिल्ह्यात प्रामाणिक व समाजकार्यांमध्ये निस्वार्थीपणे काम करणाऱ्या संघटना आहेत. तसेच चळवळीचे कार्यकर्ते आहेत. परंतु ,काही महाभाग हे आपण म्हणतोय तेच खरे असे समजून आर्थिक लाभासाठी आंदोलनाचा बाव करतात. त्याला काही लोकांकडून जाणीवपूर्वक खत पाणी घातले जाते .यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला त्याची चांगलीच सवय झाल्याने अलीकडच्या आंदोलनातून सहसा काही हाती लागत नाही हेच दिसून आलेले आहे. दरम्यान दोन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्वालाग्रही पदार्थ अंगावर टाकला. पण पोलीस यंत्रणे तातडीने त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारणी केल्यामुळे दोघेजण अक्षरशः गारठून गेले होते. तसेच त्यांच्या खिशातील मौल्यवान वस्तू सुद्धा पाण्यामुळे भिजल्या होत्या तर एका युवतीला पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. हे आजच्या स्वातंत्र्य दिनाचे वैशिष्ट्य ठरले.
दरम्यान, लोकशाहीचा चौथा स्तंभ असा गौरव केलेल्या प्रसारमाध्यमाच्या काही प्रतिनिधींचा पोलीस अधिकाऱ्यांनी कॅमेरा घेऊन त्याचे चित्रीकरण डिलीट करण्यापर्यंत मजल गेली होती. वास्तविक पत्रकारिता करत असताना लोकांच्या समोर सत्य जावे हा त्याच्या मागचा हेतू होता. परंतु ,आता प्रसारमाध्यमांनी ही आपली कृती योग्य अयोग्य आहे ? याचा दाखला जिल्हा प्रशासन व पोलीस नियंत्रण द्यावा. इतकी पत्रकारिता कूचकामी ठरू लागली आहे का ? याचे आत्मचिंतन करावे. असा सल्ला ज्येष्ठ मार्गदर्शक प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी दिला आहे.

————————————————————

फोटो –
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यापूर्वीच पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतलेले आंदोलक

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button