दहिवडी:-माढा मतदार संघात शेखर गोरेंच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
माढा मतदार संघात शेखर गोरेंच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या…
दहिवडी दि: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्याच टप्प्यात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्या पाठोपाठच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली. त्याच बरोबर सोलापूरचे वजनदार नेते व मान्यवरांनी ही निवडणूक महत्त्वाची मानली आहे. अशातच माण तालुक्याचे सुपुत्र व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, शिवसेना संपर्कप्रमुख शेखर गोरे यांच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या तरी त्यांचे भूमिका तटस्थ असली तरी त्याचा नेमका फायदा कुणाला होणार ? याबाबत आता राजकीय गोटात चर्चा सुरू झालेली आहे.
सर्वसामान्य मतदारांशी नाळ असलेली नेते शेखर गोरे यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने वेगळे वळण लागले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बोटचेपी धोरणामुळे होय . त्यामुळे राजकीय सर्वाधिक नुकसान शेखर गोरे यांचे झाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत निर्णयाक मते असून सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे निवडून आले होते. हा पराभव त्यांच्या चांगला जिव्हारी लागलेला आहे. कारण ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनीच खिंडीत गाठून विश्वासघात केला होता . एक मराठा लाख मराठा या वाक्याचा खूप मोठा इफेक्ट त्यावेळी जाणवला होता.
आता राजकारणात त्याची परतफेड करण्याची नामी संधी शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांना मिळाली आहे. त्याचे ते निश्चितच सोनं करतील परंतु, आता माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्यासाठी आता शेखर गोरे व त्यांच्या समर्थक सज्ज झालेले आहेत. एकूणच माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना काही वेळेला दिलासा देण्याचे काम शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांकडून झालेले आहे. याचे कारण, म्हणजे महाविकास आघाडी बाबत आपली नाराजी लपून न ठेवता शेखर गोरे यांनी बेधडक माण- खटाव तालुक्यात मेळावा घेऊन आपली नाराजी स्पष्ट केले आहे.
राजकारणामध्ये घेतलेले कर्ज व्याजासह परतफेड करण्याची नवीन कला सर्वांनाच अवगत झालेली आहे. शोले चित्रपटातील डायलॉग सारखे तुम एक मारोंगे…. तो हम चार मारेंगे… याची आता अचूक पाहण्यास मिळणार आहे. सध्या फलटण व माण – खटाव विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील या दोन विधानसभा मतदारसंघावर अनेकांची भिस्त आहे. कारण रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे फलटणचे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातून त्यांना विरोध झाला असला तरी जमेची बाजू म्हणजे महाविकास आघाडी पासून चार हात लांब राहणारे शेखर गोरे यांची भूमिका महाविकास आघाडीमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर गोरे यांची भूमिका ही धक्कादायक मानली जात नाही. कारण, गुणवत्ता असताना सुद्धा राष्ट्रवादीने त्यांना चांगलेच खेळवले आहे. आता शेखर गोरे च्या हातात राजकीय बॅट आली असून राष्ट्रवादीच्या बॉलिंग वर षटकार, चौकार मारतात का क्लीन बोल्ड होतात? हे पहावे लागणार आहे. एकूणच माढा लोकसभा मतदारसंघाची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवली तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख ८६ हजार ३१४तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळी विरोधात उभे असलेले संजय मामा शिंदे यांना पाच लाख ५५० मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीला म्हणजे ॲड. विजयराव मोरे यांना ५१,५३२ तर नोटाला ३३६६ मते मिळाली होती. ह्या आकडेवारी मध्ये जर तफावत पाहिली तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तब्बल ८५ हजार ७६४ मताने निवडून आले तर ३० उमेदवारांना सहा लाख २९ हजार ७०५ एवढी मते मिळाली होती. यामध्ये तीन हजार ३६६ मतं ही नोटाला म्हणजे उमेदवार पसंत नाही. अशा पद्धतीने मतदान झाले होते. आज पाच वर्षाच्या कालावधीनंतर जर आकडेवारी पाहिली तर शेखर गोरे यांच्या भूमिकेचा काय परिणाम होईल? हे पाहणे आता राजकीय विश्लेषकांना कोड्यात पाडणारे ठरले आहे.
————————————–+—————–
फोटो -हर्षवर्धन मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर व शेखर गोरे