सातारा जिल्ह्यात भाजप नूतन जिल्हाध्यक्ष श्री कदम यांच्या जन्मभूमीतच आंदोलन करूनच स्वागत.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्ह्यात भाजप नूतन जिल्हाध्यक्ष श्री कदम यांच्या जन्मभूमीतच आंदोलन करूनच स्वागत.
सातारा दि: भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्षपदी खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील युवा नेते धैर्यशील कदम यांची नियुक्ती झाली. त्यांचे सातारा जिल्ह्यात आगमन होतच त्यांच्याच खटाव या जन्मभूमीत राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व घटक पक्षाने कातरखटाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून स्वागत केले. त्याची आता चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागलेली आहे.
सब भूमी गोपाल की या न्यायाप्रमाणे सध्या भाजप पक्ष वाढू लागलेला आहे. २०१९ साली शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणारे श्री कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांना भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली .विशेष म्हणजे यापूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रीय काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांचीही यापूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर एकाच माण खटाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा सातारा जिल्हाध्यक्ष दिल्यामुळे भाजपमधील निष्ठावंत नेते व कार्यकर्ते हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून आहेत.
खटाव तालुक्यात भाजपचे पहिले आमदार म्हणून डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजप ची खिंड लढवली होती. परंतु ते या जिल्हाध्यक्षपदाच्या स्वागत समारंभ कुठे दिसले नाहीत. वास्तविक पाहता भाजपची खिंड लढवणारी योद्धा म्हणून त्यांच्याकडे खटाव तालुका पाहत आहेत. सध्या भाजपा शिस्तीचा पक्ष असे मानले जात असले तरी सातारा येथील भाजपच्या पत्रकार परिषदेला व्यक्तीनिष्ठा मानणाऱ्या कार्यकर्त्यांनाच गर्दी केल्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना उभे राहूनच या स्वागत समारंभाचे पत्रकार परिषदेचा आस्वाद घ्यावा लागला. धैर्यशील कदम हे सर्वसामान्य कुटुंबातील नेते व कार्यकर्ते आहेत .सामान्य माणसाची नाळ त्यांना माहिती आहे .आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते भाजपला ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने यश मिळवून देऊ शकतात. परंतु, हे करत असताना इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावीच लागणार आहे. त्याबद्दल कोणाचे दुमत नाही. सातारा शहरातील भाजपच्या या कार्यकर्ते मेळाव्याला नवीन नवीन चेहरे दिसत असल्यामुळे धैर्यशील कदम यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले.
सच्चा भाजप निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्यांची विभागणी कशी काय करायची? असा मार्मिक प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. याचीच प्रचिती पक्ष वाढवताना वरिष्ठ नेत्यांना पाळावी लागतात. पण राजकारणात नियम पाळले जात नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना ते कधी क्रियाशील सभासद झाले? त्यांनी कधी पक्ष प्रवेश केला? याची चाचणी न करता त्यांना पक्ष प्रवेश दिल्यामुळे आता तो एक चर्चेचा विषय झालेला आहे. खटाव तालुक्याला राष्ट्रीय काँग्रेस व भाजप, मनसे अशा तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पण, सत्तेत सहभागी झालेल्या भाजप जिल्हाध्क्षपदी निवड झालेल्या श्री कदम यांचे त्यांच्याच जन्म व कर्मभूमीत या निवडीचे स्वागत स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलनाने केल्याने त्याची चांगलीच शाब्दिक चर्चा सुरू झाली आहे.
————————————————————
फोटो – खटाव तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळताच रस्ता रोको आंदोलन झाल्याने इतिहासात त्याची नोंद घ्यावी लागली आहे. (छाया -अजित जगताप सातारा)