ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर:-प्रशासन व जनतेतील समन्वयासाठीच जनता दरबार : आमदार काशिनाथ दाते.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

प्रशासन व जनतेतील समन्वयासाठीच जनता दरबार : आमदार काशिनाथ दाते.

पारनेरमध्ये आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वात जनता दरबाराचे यशस्वी आयोजन.

 

प्रतिनिधी /
पारनेर शहरातील इंदिरा भवन येथे लोकप्रिय आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला शेकडो नागरिकांनी आपल्या विविध समस्या घेऊन हजेरी लावली. नागरिकांच्या प्रश्नांना ऐकून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन आमदार दाते यांनी दिले. दरमहा एक दिवस जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.या जनता दरबारात नागरिकांनी महसूल विभाग, पुरवठा विभाग, भूजमापन विभाग, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेऊन अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावले. तहसीलदार गायत्री सौंदाणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार, पारनेर पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सुपा पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्परता दाखवली.जनता दरबारात महायुतीच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळ चालू ठेवण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटिल शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, ज्येष्ठ नेते वसंत चेडे, जिल्हा बँक संचालक प्रशांत दादा गायकवाड, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुषमाताई रावडे, युवक अध्यक्षा अपर्णा खामकर, संदीप कपाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याचे काम केले.आमदार काशिनाथ दाते यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांवर झालेला अन्याय दूर करण्याचा निर्धार व्यक्त केला. “नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून निराकरण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करून आम्ही जनतेच्या जवळ राहू,” असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास निर्माण झाला असून, अनेकांनी आमदार दाते यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.हा जनता दरबार यशस्वी ठरला असून, येत्या काळातही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार दाते आणि महायुतीचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे दिसून आले. या दरबारामुळे पारनेर तालुक्यातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

चौकट :

[“नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने निराकरण करणे हा जनता दरबाराचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक महिन्याला असा दरबार आयोजित करून आम्ही जनतेच्या जवळ राहू आणि त्यांच्यावर झालेला कोणताही अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू. आज शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या, त्यापैकी अनेक प्रश्न मार्गी लावले असून, उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल.
काशिनाथ दाते (आमदार)]

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button