कराड:-विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा गृहपाठ केलाच पाहिजे.
प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव :-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा गृहपाठ केलाच पाहिजे.
आ.बाळासाहेब पाटील: शिरवडेत कर्मवीर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
शिरवडे,ता.कराड: आताच्या शासनाने गृहपाठ बंद करण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी गृहपाठ केलाच पाहिजे. त्याशिवाय उजळणी व अभ्यास होणार नाही. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळणे आवश्यक आहे असे रयत शिक्षण संस्थेचे सदस्य मा.आ. बाळासाहेब पाटील म्हणाले. शिरवडे येथील ज्योतिर्लिंग विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त त्यांनी मार्गदर्शन केले. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
रात्री टिव्हीवर मालिका पाहण्यापेक्षा पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यायला पाहिजे. रयत संस्थेचे ग्रामीण भागातील मुला-मुलींना परगावी जाण्याऐवजी परिसरातील गावात शिक्षणाची सोय झाली. रयतच्या कमवा आणि शिका या संकल्पनेने अनेकजण स्वावलंबी झाले. अशा आदर्श संस्थेचा सदस्य असल्याचा आनंद वाटतो. रयतचा आदर्श घेऊन इतर संस्थांचेही आजही शैक्षणिक कामकाज सुरू आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच स्कॉलरशिप मिळालेल्या सिद्धी जगदाळे, अवंतिका जाधव व दहावीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्मवीर जयंतीनिमित्त सवाद्य पारंपरिक पद्धतीने मिरवणूक घेण्यात आली.
या कार्यक्रमास रयत संस्थेचे डॉ.शिवलिंग मेनकुदळे, हिंदकेसरी संतोष वेताळ, माणिकराव पाटील, माजी उपसभापती सुहास बोराटे, मोहम्मद आवटी, बाजीराव जगदाळे, सरपंच अनिल जगदाळे, सर्जेराव थोरात, हणमंतराव पाटील, राजन पाटील, सतिश पाटील, जयंत गायकवाड, ताजुद्दीन संदे हे उपस्थित होते. मोठया संख्येने पालक उपस्थित असल्याने शैक्षणिक जागरूकता असल्याचे आ.पाटील म्हणाले.
डॉ.शिवलींग मेनकुदळे यांनी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक शिवाजी राखुंडे यांनी प्रास्ताविक केले. तर अशोक निकम यांनी आभार मानले.