क्रीडा नागपूर:-भारतीय फिरकी पुढे ऑस्ट्रेलियाची शरणागती….भारताचा 1 डाव आणि 132 धावानी बलाढ्य विजय.
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
( क्रीडा) नागपूर:- भारतीय फिरकी पुढे ऑस्ट्रेलियाची शरणागती….भारताचा 1 डाव आणि 132 धावानी बलाढ्य विजय.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने अश्विन-जडेजा ची फिरकी व रोहित,जडेजा, अक्षर यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया वर 1 डाव आणि 132 धावानी बलाढ्य विजय मिळवला…
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया ने घेतलेला प्रथम फलंदाजी चा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवत ऑस्ट्रेलिया चा डाव 177 धावांत गुंडाळला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताकडून रोहित शर्मा चे विक्रमी शतक व जडेजा अक्षर च्या अर्धशतकांच्या जोरावर 400 धावा करत मोठी आघाडी घेतली..
दुसऱ्या डावात ही अश्विन च्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलिया चा निभाव लागला नाही आणि भारताने सामना 1 डाव 132 धावानी जिंकून 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
सामन्यात 7 बळी आणि 70 धावा करणाऱ्या जडेजा ला सामनाविराचा बहुमान मिळाला.
प्रतिनिधी : – सागर पिसाळ (7875411591)