वाई:-स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी कौशल्ये विकसित करणे ही काळाची गरज.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR
दि.14 वाई
स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी कौशल्ये विकसित करणे ही काळाची गरज.
प्रा. नारायण चौधरी यांचे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय वाई, मध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, कौशल्ये व व्यवसाय शिक्षण केंद्र, महिला सबलीकरण कक्ष आणि नांदी फाउंडेशन, महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सहा दिवसीय जीवन कौशल्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही कार्यशाळा महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या समन्वयाने संपन्न झाली. विद्यार्थीनीनी स्पर्धायुक्त युगात यशस्वी होण्यासाठी अभ्यासपूर्ण वृत्तीने कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे असे, प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी यांनी कार्यशाळेच्या सांगता समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रा. नारायण चौधरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आजचे युग गळेकापू स्पर्धेचे आहे, त्यामुळे विद्यार्थीनीनी प्रचंड मेहनत, कठोर परिश्रम, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, साहस, संभाषण कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, वेळेचे नेटके नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, धेयनिष्ठा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या गुणांच्या सहाय्याने स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विविध कौशल्ये विकसित करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते.
प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थीनीनी जीवनात यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, यश प्राप्तीसाठी, स्वतःला सिद्ध करून, स्वतः मध्ये बदल घडवावा यासाठी स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून जीवनात यशस्वी होता येते असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेसाठी अंतिम वर्षाच्या ४० विद्यार्थीनी सहभाग घेतला. एकूण ६ दिवसात १८ सत्रामध्ये ३६ तास प्रात्यक्षिकासह विद्यार्थीनी विविध कौशल्ये आत्मसात केली नांदी फाउंडेशन, पुणे संस्थेच्या प्रशिक्षक प्रियांका शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे संयोजन डॉ. रामदास बोलके यांनी केले. विद्यार्थीनीनी आपल्या प्रतिसादात कौशल्य विकसित कार्यशाळेमुळे सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन कुमारी यशस्विनी चोरगे व कुमारी नेहा निंबाळकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रामदास बोलके व आभार कुमारी धनश्री बाबर यांनी केले. याप्रसंगी डॉ. विनोद वीर, डॉ. मंजुषा इंगवले, प्रा. दिपाली चव्हाण प्रा. दिपाली पाटील, संदीप पातुगडे, प्रा. चंद्रिका साबळे व प्रा. श्रुती यादव आदि शिक्षक व कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.