सातारा:-सामाजिक प्रश्नांबाबत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना वंचितचे निवेदन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सामाजिक प्रश्नांबाबत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना वंचितचे निवेदन.
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य कष्टकरी शेतमजूर व बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी तन-धनाने लढणारे वंचित बहुजन आघाडीचे महा सचिव श्री गणेश भिसे यांनी सातारा जिल्ह्याच्या वतीने राज्यातील व जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले . यावेळी वंचितचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भिमाई आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्यदिव्य भिमाई स्मारकाचे काम लवकर सुरू करून त्याला तातडीने निधी उपलब्ध करावा. डॉ. आंबेडकर यांचे सदर बाजार येथील बालपणीचे निवासस्थान असलेल्या आमणे बंगला याचे शासकीय पातळीवर लेखी आवड झाले असून ती जागा शासनाने ताब्यात घेऊन राष्ट्रीय स्मारक उभे करावे व श्री आमणे यांनाही न्याय द्यावा. डॉ. आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण पूर्वीचे सातारा हायस्कूल व सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा या ठिकाणी झाले होते .सदर शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा. राज्यातील ओ.बी.सी. मराठा आरक्षणावर सामंजस्याने तोडगा काढावा. ओ.बी.सी.च्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एस.सी. एस.टी. आरक्षणाला वर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे तसेच क्रिमिअर अट घातली आहे. यामुळे एस.सी. एस.टी.च्या आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण वर्गीकरण व क्रीमियर लागू करण्यात येऊ नये.
महाराष्ट्र राज्यात धार्मिक जातीय वातावरण बिघडवण्याचे काम काही पक्ष संघटना करीत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे , महिलांचे , कष्टकरी जनतेचे , दलितांचे , आदिवासींचे प्रश्नाला बगल देत प्रत्येक गोष्ट जात आणि धर्माच्या आधारावर पाहिली जात आहे. सामाजिक सलोखा बिडवण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत. या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करून राज्यातील सामाजिक , जातीय , धार्मिक सलोखा राखावा.
या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला . लवकरात लवकर प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळास दिले जिल्ह्याची माहिती यावेळी श्री भिसे व श्री देसाई यांनी सांगितले.