सातारा :-खटाव माजी तहसिलदार यांची बदली थांबवू नये रा स प चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
खटाव माजी तहसिलदार यांची बदली थांबवू नये रा स प चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
सातारा दि:- खटाव तालुक्यात कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी तथा खटावचे तहसीलदार जाधव यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे किरण जमदाडे यांची बदली थांबवू नये अशी विनंती खटाव तालुक्याच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर व विविध गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
खटाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना खटाव चे तहसीलदार म्हणून प्रशांत जाधव हे मान्य असून माजी तहसीलदार यांनी सर्वसामान्य लोकांना वेठीस धरले होते. खटाव तालुक्यातील गौण खनिज पासून ते अनेक आदेश त्यांनी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून काढले होते. यामध्ये पैशाचा अपहार झाला असून सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष पसरला होता.
माजी तहसीलदार किरण जमदाडे यांचे कामे संविधानाला धरून नसून मेघा कंट्रक्शन रोडवेज व अनेक खडी मशीन यांनी या ठिकाणी आपली मनमानी कारभार केल्यामुळे त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केले होते. त्याचा अद्यापही निकाल लागला नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तरी सर्वांच्या भावना समजून घेऊन किरण जगदाडे यांची सखोल चौकशी करून त्यांना पुन्हा खटाव तालुक्यात आणू नये. अन्यथा दि २७ जून रोजी तहसील कार्यालय वडूज येथील तहसीलदार कार्यालयाच्या दालनासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आलेला आहे.
या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य महसूल सचिव ,पुणे विभागीय आयुक्त, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांना पाठवण्यात आलेले आहेत.
सदर निवेदनावर रासप सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर ,जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे ,उमेश चव्हाण, प्रकाश तोरणे, अजित साठे, मनोज घाडगे आधी खटाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत. काही व्यक्तिगत स्वार्थासाठी अथवा कुणाच्या सांगण्यावरून हे निवेदन देण्यात येत नाही. तर सर्वसामान्य पिळवणूक झालेल्या गोरगरीब जनतेच्या वतीने आम्ही हे निवेदन दिलेले आहे. तसेच नूतन तहसीलदार प्रशांत जाधव यांनी सुद्धा खटाव तालुक्यात कामकाज करताना पूर्वीच्या तहसीलदारांसारखे मनमानी कारभार व भ्रष्ट लोकांच्या संगती राहू नये. सामाजिक कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान द्यावा परंतु सामाजिक कार्यकर्त्याच्या आड दलाली करणाऱ्यांना मात्र त्यांची जागा दाखवावी अशा शब्दात आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी खटाव तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————–