मागणी:-कलेढोन परिसरात विजेचा खेळखंडोबा : कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण.
प्रतिनिधी प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कलेढोन परिसरात विजेचा खेळखंडोबा : कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण.
मायणी प्रतिनिधी – कलेढोन परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला असून कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. मात्र याकडे महावितरण कंपनी कडून जाणीवपूर्वक केले जाते परिणामी द्राक्ष बागांना तसेच इतर पिकांना पाणी मिळत नसल्याने बागायतदार
पुरते हैराण झाले असून परिसरातून महावितरण कंपनीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
खटाव तालुक्यातील कलेढोण व परिसरातील विखळे, पाचवड, तरसावडी, गारुडी, गारळवाडी बेलेवाडी रानमळा, पवार मळा, या परिसरात मोठ्या प्रमाणत द्राक्ष बागा असून सर्व बागा फळावर आहेत. यंदाच्या वर्षी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे परंतु बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास महावितरण कंपनी कडून हिसकावून घेतला जात आहे. तसेच
या भागात द्राक्ष बागासोंबत मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, ज्वारी, मका, अशी पिके ऐन बहरात आली आहेत. त्याचबरोबर दुपारी तापमान देखील वाढत आहे त्यामुळे सद्या या पिकांना वरचेवर पाणी द्यावे लागते. द्राक्ष बागांना देखील दिवसातून किमान तीन ते चार तास पाणी देणे गरजेचे असते परंतु महावितरण कंपनीच्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे सातत्याने वीज खंडित होत असून द्राक्ष पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने बागायतदार व शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
गेले दोन महिने महावितरण कंपनी कडून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. काही भागात वीज सोडली जाते तर काही भागात वीज पुरवठा च खंडित करून ठेवलेला असतो. त्याचबरोबर तांत्रिक बिघाड झाले तरी कंपनीच्या कर्मचऱ्यां कडून या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांना स्वतः चां जीव धोक्यात घालून
ते सतत सुरू असतात त्यामुळे थ्री फेज शेती पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.