सातारा भाजप जिल्हा अध्यक्षपदी श्री. धैर्यशील कदम यांच्या निवडीने जल्लोष.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा भाजप जिल्हा अध्यक्षपदी श्री. धैर्यशील कदम यांच्या निवडीने जल्लोष.
सातारा दि: राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आता भाजपचे कमळ चांगले फुलू लागलेले आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सन्मानाची वागणूक मिळत असून कराड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या गळ्यात सध्या भाजप सातारा जिल्हाध्यक्ष पदाची टाकल्याने सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी भागातील नेतृत्व म्हणून श्री कदम यांनी गेले पंचवीस वर्षांमध्ये आपल्या राजकीय कर्तबगारी व सामाजिक, सहकार , राजकीय क्षेत्रात चांगले घोडदौड केलेली आहे. एक सामान्य जनतेतून आलेला कार्यकर्ता- नेता. अशी त्यांची प्रतिमा आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक असलेल्या धैर्यशील कदम यांनी २०१९ साली शिवसेनेत प्रवेश करून कराड उत्तर मधून शिवसेनेची उमेदवारी केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला . त्याचा फायदा त्यांना होऊ लागला आहे.
अनेक राजकीय पक्षांमध्ये त्यांचे चांगले संबंध असून त्यांचा मित्रपरिवार ही मोठा आहे. भारतीय जनता पक्षाने पक्षाचा विस्तार करताना सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना कार्यकर्ताच ठेवले आहे तर इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना सन्मानाची वागणूक दिलेली आहे. तसेच त्यांना मोठेपणही दिलेले आहे. राष्ट्रीय काँग्रेस मधून आलेल्या आमदार जयकुमार गोरे यांच्या नंतर शिवसेनेतून आलेल्या श्री . धैर्यशील कदम यांचे भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आलेली आहे. मुळातच भाजपमधून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने थेट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केलेले आहे. हे विसरून चालणार नाही. सातारा जिल्ह्यातील भाजपची धुरा सांभाळणारे राजाभाऊ देशपांडे, आण्णासाहेब पवार, अनुप सूर्यवंशी,दत्ताजी थोरात, सोपानराव गवळी भोसले, गिरीष कुबेर, मिलिंद काकडे ,बबन कांबळे,विजय काटवटे अशी अनेक नावे आहेत. परंतु सध्या पक्ष वाढवताना इतर पक्षातून आलेल्या लोकांना संधी देणे क्रमप्राप्त आहे.
१९७७ साली साताऱ्यात जनता पक्षातून अभयसिंहराजे भोसले हे आमदार झाले होते .त्यानंतर सेना-भाजप युतीतून १९९५ साली जावळीतून शिवसेनेचे सदाशिव सपकाळ, १९९६ शिवसेनेचे खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर व १९९८ ला भाजपचे श्री छ उदयनराजे भोसले हे सातारचे आमदार तसेच राज्याचे महसूल राज्यमंत्री झाले होते. त्यानंतर खटाव मधून भाजपचे डॉ. दिलीप बेळगावकर हे निवडून आले होते. शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी पाटणचे आमदारकी खेचून आणली होती. फलटणचे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस सातारा जिल्हाध्क्षपद सोडून भाजपचे माढा लोकसभा मतदार संघात खासदार झाले.हा भाजप- सेनेचा इतिहास असला तरी सध्या सेना-भाजपमध्ये फूट पडले असून भाजप आता स्वतंत्ररित्या सक्षम झालेली आहे.
भाजपकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे ,आमदार महेश शिंदे व शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई अशी भक्कम फळी असून आता त्यांना भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री. कदम यांची मोलाची साथ लाभलेली आहे .यापूर्वी भाजपमधील अविनाश फरांदे,भिकूभाऊ भोसले ,भरत पाटील, विक्रम पावसकर यांनी भाजपची धुरा सांभाळली होती. आता सर्वसामान्यांशी नाळ असलेले श्री. धैर्यशील कदम यांच्या गळ्यात सातारा भाजप जिल्हा अध्यक्ष पदाची माळ टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात कराड उत्तर मधून भाजपला चांगली संधी आलेली असून भाजप आमदाराचा चौकार ते मारतील का? असा प्रश्न आता इतर कार्यकर्त्यांना पडलेला आहे. सध्या श्री. कदम यांच्यासाठी खूप मोठी संधी असून भाजपचे कट्टर हिंदुत्ववाद व सामान्य माणसाची असलेली नाळ अशा दोन्ही भूमिकाचे किती सक्षमपणाने समर्थन करतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. श्री कदम यांच्या निवडीने भाजप मध्ये जल्लोष होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून श्री कदम यांच्या निवडीने भाजप पक्ष वाढीला अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. माण पाठोपाठ खटाव तालुक्याला भाजप ने संधी दिली आहे. त्याचे ही कौतुक होत आहे.
————————————————————– फोटो- भाजप सातारा जिल्हाध्यक्ष श्री कदम यांच्या समवेत सहकारी,,, शिवसेनेत प्रवेश करताना श्री कदम,,