ताज्या घडामोडी

निमसोड:-त्यांच्याकडे माल आहे माझ्याकडे काही चीचुक्याचे पोते आहे का?- आ.गोरे

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

त्यांच्याकडे माल आहे माझ्याकडे काही चीचुक्याचे पोते आहे का?- आ.गोरे

निमसोड दि: माण- खटाव मतदार संघातील विधानसभेच्या मैदानात कुणीही येऊ द्या. माझी अडचण नाही. मी किस्ताक लावून मैदानात तयार आहे. एक ठेकेदार, एक माजी आयुक्त शंभर कोटी रुपये खर्च करायला तयार झालेले आहेत. त्यांच्याकडे माल आहे. माझ्याकडे चीचुक्याचे पोते आहे का ? असा मार्मिक सवाल माण- खटावचे भाजपचे आ. जयकुमार गोरे यांनी विखळे फाटा ता. खटाव येथे झालेल्या जाहीर सभेत केला.
माण व खटाव तालुक्यातील उत्तर व पश्चिम मधील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेत उर्वरित गावाचा समावेश करून निधी तरतूद केल्याबद्दल हा जाहीर मेळावा घेण्यात आला होता. परंतु या मेळाव्याला भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत. आता शंभर टक्के माण खटाव दुष्काळमुक्त होणार अशी आशा निर्माण झाली आहे.
या मेळाव्याला भाजप नेते व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, श्रीमती सोनिया गोरे, भाजप खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, धनाजी देशमुख, शिवाजी घाडगे ,अमोल यमगर, बापूराव निकम यांच्यासह पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधकांचा समाचार घेताना आ. गोरे म्हणाले, पाण्याचा प्रश्न हाती घ्यायाचा काडी लावायची आणि शेकत बसायचे. विखळे गावात पाणी परिषद झाली. त्यावेळेला मी शब्द दिला होता. त्यानंतर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फेर वाटपाचा निर्णय घेतला. त्यामुळे शब्दाची पूर्ती झालेली आहे. परमेश्वराचे व जनतेचे आशीर्वाद उभे राहिल्यामुळेच मला ताकद मिळत आहे. पाच वर्षानंतर या पाणी वाटप भूमिपूजन होत आहे. आता या भागात उसाची शेती व कारखान्याचे धुराडे बघायचे आहे. दुष्काळी कलंक पुसायचं. असे स्पष्ट करून आ. गोरे म्हणाले, गोपूज ,पडळ, त्रिमली ,देवापुर येथे कारखाने उभे राहिलेले आहेत .उरमोडीचे पाणी आलेले आहे. लाभ क्षेत्रातील उसाची लागवड वाढल्यामुळे आता जिहे कठापूर योजनेचे उरमोडीचे पाणी आलेले आहे. २२ किलोमीटर बोगद्याचे काम झाले असून नेर ,येरळा नदीचे आता पाणी वाहत असून माण तालुक्यातील मानगंगेतही उरमोडी नदीचे पाणी पोहोचलेले आहे. संघर्ष केल्यामुळेच पाणी आलेले आहे. पूर्वी ३२ गाव होती. त्यानंतर ती ४२ झाली. आता ५१ गावांना पाणी मिळणार असून कोणताही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही. २०१७ साली एक आयुक्त सेवानिवृत्त झाले. आता ते जनतेची दिशाभूल करत आहेत. सर्वांना जयकुमार गोरे टोचतोय. रामराजे तर रात्रीचे चावळत आहेत .उठता- बसता- चालता त्यांना गोरे दिसत आहे. अशी त्यांनी टीका केली.
मला आमदारकी मंत्र्यापेक्षाही पाणी देणे महत्त्वाचे वाटत आहे. पन्नास हजार बहिणींना साडी वाटप करण्याची माझ्याकडे दानत असून त्यांच्या आशीर्वादाने मुळेच मी अपघातातून वाचलेलो आहे. आता मी खणखणीत असून या निवडणुकीत मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने बाजी मारणार आहे. कोणी कितीही ताकद लावली तरी मी पण कमी नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. येळगावकर यांनी सांगितले की, पाण्यासाठी मी अनेकांना अंगावर घेतले. माझं राजकीय करियर उध्वस्त करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मी आव्हान दिलेले आहे. तीन वेळा मृत्यूच्या दारात नेहले. मान खटावला पाणी देण्यासाठी आ. जयकुमार गोरे यांनी संघर्षाचा कळस चढवला आहे. पाण्यासाठी आंदोलन झाले .गोळीबार झाला. कळंबा जेलमध्ये जाऊन आलो. पण योजना पूर्ण होते याचा आनंद वाटत आहे. या भागाबद्दल नेतृत्व करणारे यशवंतराव चव्हाण, शरद पवार, प्रतापराव भोसले, मोहिते- पाटील यांना पाणी आणता आले नाही. ते काम जया भाऊंनी केलेले आहे. १९९८ सालापासून लढा देत आहे. स्वप्न सत्यात आलेल्या आनंद वाटत असून टेंभूचे पाणी येणार असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी हलगी घुमके निनादात मान्यवरांचे स्वागत झाले. तसेच कुदळ मारून भूमिपूजनही करण्यात आले. नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी निमसोड गटातील अनेक मान्यवरांनी आ. जयकुमार गोरे व डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या भागात भाजपची प्रचंड ताकद वाढली आहे. सदर मेळाव्यासाठी मोठ्या उत्स्फूर्तपणाने स्थानिक भूमिपुत्र शेतकरी सभासद यांनी गर्दी केली होती. हा मेळावा यशस्वी झाल्यामुळे आ. जयकुमार गोरे यांनी सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button