कुरवंडे :-स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पोहोचली कुरवंडे येथील धनगर वस्तीवर लाईट.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पोहोचली कुरवंडे येथील धनगर वस्तीवर लाईट.
आपला भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आणि त्याचा आनंदोत्सव सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा होत असताना मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातील धनगर वस्ती मात्र अजूनही अंधारातच जीवन जगत होते, कारण अद्यापही तेथे लाईट पोहोचली नव्हती. परंतु मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर गावामध्ये लाईटची व्यवस्था करण्यासाठी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून विद्युत पुरवठा करण्यासाठी २८ विजेचे खांब, विद्युत वाहक तारा आणि ६३ केव्हिए क्षमतेचा ट्रांसफार्मर बसविण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उदघाटन करून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.
मागील अनेक वर्षे प्रकाशाची वाट पहाणार्या कुरवंडे येथील धनगर वस्तीवरील लहान, मोठे, वयस्कर असे सगळेच ग्रामस्थ अतिशय आनंदी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.