साताऱ्यात काही भुकेसाठी तर काही धावले पोटाचा घेरा कमी करण्यासाठी ……..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात काही भुकेसाठी तर काही धावले पोटाचा घेरा कमी करण्यासाठी ……..
सातारा दि: शरीर संपदा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचा संभाळ करण्यासाठी व्यायाम उपयुक्त आहे. त्याचबरोबर शरीराला अन्न- वस्त्र- निवारा लागतो. त्यासाठी सुद्धा काहींना धावावे लागते. आज साताऱ्यातील हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये काहीजण धावले भुकेसाठी तर काहीजण आपल्या पोटाचा घेरा कमी करण्यासाठी धावण्याचेच दिसून आले आहे. यामुळे इंडिया विरुद्ध भारत असे सुस्पष्ट व विचार करण्यास लावणारे प्रसंग डोळ्यासमोर आले.
या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला तर कास पठार परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना व काहींना रोजगाराला मुकावे लागल्याची खंत व्यक्त होत आहे. गोरगरीब- कष्टकरी- शेतमजुरांना रविवारच्या बाजारच्या दिवशी सकाळी दूध, भाजीपाला व इतर साहित्य विक्रीसाठी काही काळ थांबावे लागले. याची चांगलीच प्रसारमाध्यमाने नोंद घेतली आहे. मुळातच हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यामागे साताऱ्यातील काही शासकीय वरिष्ठ पातळीवर पाठ्यबळ व इव्हेंट मॅनेजमेंटचे मोलाचे सहकार्य मिळाले. यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली असली तरी गेली तेरा वर्षे गोरगरीब कष्टकरी व स्थानिक भूमिपुत्र याबाबत अन्याय सहन करत आहेत. आता यापुढे हे असेच चालू राहणार असेल तर नवीन येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा शासकीय योजना म्हणून हाफ मॅरेथॉनचा समावेश करावा. अशी उपरोधात्मक मागणी होऊ लागलेली आहे.
खरं म्हणजे सातारा जिल्ह्याच्या निसर्गरम्य अशा कास पठारामध्ये अनेक पर्यटक भेट देतात. त्यामुळे स्थानिकांना खूप मोठा रोजगार उपलब्ध होतो. परंतु, रविवार हा सुट्टीच्या दिवशीच कोणतीही पूर्व सूचना न देता सातारकरांच्या माथी हाफ मॅरेथॉन स्पर्धा लादली गेलेली आहे. यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद करण्यात आली. २१ किलोमीटरच्या अंतरावरील ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता सुरू होऊन पाच तास काही रस्ते बंद करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल व विविध व्यावसायिक लोकांनी पायघड्या घातल्यामुळे सुमारे आठ हजार धावपटूंना व मॅरेथॉनपटूंना कोणतीही अडचण वाटली नाही. विशेष बाब म्हणजे साताऱ्या व्यतिरिक्त पुणे- मुंबई व इतर राज्यातून तसेच परदेशातूनही काही हौशी धावपटू व मॅरेथॉन पटू आले होते. त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. काहींनी तर आपल्या पोटाचा घेरा कमी करण्यासाठी धावण्या शिवाय पर्याय नसल्याचे जाणीव करून दिली. पण, ज्यांचे हातावर पोट आहे आणि पोटाला भूक आहे. अशी मंडळी या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमुळे रोजगार व कामासाठी चांगलेच धावत असल्याचे चित्र दिसत होते.
सातारा शहरातील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या ऐतिहासिक हाफ मॅरेथॉन स्पर्धेमुळे इंडिया विरुद्ध भारत असेच चित्र काही सूक्ष्म अभ्यासू व जानकरांनी पहिल्याची नोंद घेतली आहे. साताऱ्यात होणाऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला विरोध नाही. स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली .पण एरवी, रस्त्याच्या अडीअडचणी बाबत सामान्य कार्यकर्ता आंदोलन करतो. शासकीय कामात अडथळाला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, या ठिकाणी तर संपूर्ण शासनच आपल्या दारी आल्याचे चित्र निर्माण केले गेलेले आहे. जेवढ्या तात्परतेने जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला. तेवढ्या तत्परतीने जर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जर जिल्हा प्रशासन व पोलीस दल धावले तर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार आहे. असे दस्तूरखुद सातारा स्टेडियमवर नियमित व्यायाम करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्ते व खेळाडूंनी सांगितले.
सदर व्यावसायिक स्पर्धेमुळे अनेकांना त्याचा चांगलाच लाभ झाला आहे. याचा आता हिशोब कोणीही कुणाला विचारणार नाही ? भक्कम कवच त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आपले प्रश्न कुणाच्या ध्यानीमनी येऊ देणार नाही. अशी तजवीज केलेली आहे. परंतु, यासाठी किती गोरगरीब व स्थानिक भूमिपुत्रांचे नुकसान झाले आहे? किती गरिबांना रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे? याचा कधीतरी लेखाजोखा माहितीच्या अधिकारात कुणीतरी मागील तेव्हाच नेमकं तेरा वर्षाच्या कारकिर्दी मधील नुकसानीचा आकडा खरोखरच किती ? हेच समजेल अशी चर्चा सुरू झालेली आहे.
या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कोल्हापूरचे उत्तम पाटील यांनी उत्तम रित्या कामगिरी केली. नागपूरच्या धावपटू तेजस्विनी लामका मुलींमध्ये पहिली आलेली आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन सर्वांनीच केली आहे. त्यांचे प्रेरणा घेऊन किमान साताऱ्यात सुद्धा धावपटूंनी व मॅरेथॉनपटू यांनी पुढील वेळेला तरी पहिल्या क्रमांक मिळवून सातारचे नाव सात समुद्रापलीकडे पोहोचवावे. मात्र ही आप मॅरेथॉन स्पर्धा दुष्काळी माण- खटाव तालुक्यात भरवली तर त्यांनाही त्याचा मनमुराद आनंद मिळणार आहे. असे सांगून विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. काही प्रसार माध्यमाने या हाफ मॅरेथॉन स्पर्धेकडे पाठ फिरवली असून त्याच्यापेक्षा विधायक उपक्रमाला प्राधान्य दिल्यामुळे त्या प्रसारमाध्यमाचेही कौतुक करण्यास सातारकर विसरले नाहीत. हे सुद्धा यानिमित्त नमूद करावे वाटत आहे. . …. …………………..