कराड:-सोशल मीडियाच्या फेक व्हिडिओ बाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सोशल मीडियाच्या फेक व्हिडिओ बाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन.
कराड दि: शिवरायांचे विचार जागवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अशा वेळी सोशल मीडियाचा उपयोग बदनामी साठी होत असून बी.जे.पी. व एन डी एच्या विरोधात समोरासमोर लढू शकत नाही. त्यामुळे लोकशाही व एकात्मता टिकवण्यासाठी फेक व्हिडिओ टोल करावा व पोलिसांना कळवा असे जाहीर आवाहन भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराड येथे झालेल्या जाहीर सभेत केले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, महायुतीचे उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे , मनोज घोरपडे, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, डॉ .अतुल भोसले, दरीत महासंघाचे मच्छिंदर सकटे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड,एकनाथ बागडी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दुपारी एक वाजता सैदापूर ओगलेवाडी रोड कराड या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी हे कराड या ठिकाणी उशिरा पोहोचले. आपल्या भाषणात उल्लेख करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज व राजश्री शाहू महाराज की जय हो चा नारा दिला तसेच मराठी भाषेत कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या सातारकरांना नमस्कार केला साताऱ्यात पहिले भगवा होता आजही भगवा फडकणार आहे फक्त तुमच्या दर्शन घेण्यासाठी आलो आहे असे सांगून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याही गौरव केला. काँग्रेस पक्ष सत्तेवर आले तर ओ.बी.सीं.च्या २७ टक्के आरक्षणावर डल्ला मारत असून हे आरक्षण मुस्लिम समाजाला कर्नाटक मध्ये घोषित केलेले आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे. तोपर्यंत धर्माच्या नावाने व संविधान बदलणार नाही. लिहून देतो असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले.
जम्मू-काश्मीरला काँग्रेस सरकारने संविधान लागू नव्हते . ते भाजप सरकारने लागू केले आहे. सामाजिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. आता निवडणूक आयोगाने फेक व्हिडिओ बाबत कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे असे ही स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी सैनिकांना एक लाख कोटी पेन्शन दिली. सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे. एक लाख एम.बी.बी.एस. डॉक्टर हे देशातील शहरी व ग्रामीण भागात सेवा देत आहेत. आयुष्यमान आरोग्य ४०० पेक्षा जास्त ठिकाणी साताऱ्यात कार्यरत आहेत .१५ जन औषधी केंद्र आहेत .यामधून ८० टक्के कमी दरात औषध उपलब्ध होत आहेत. तसेच कोट्यवधी लोकांना पाच लाख रुपये पर्यंतचे मोफत इलाज मिळत आहे. ७० वर्षा पुढील सर्व लोकांना आता आरोग्याचा खर्च करावा लागणार नाही. असे ही पंतप्रधान मोदींनी सांगितले. काँग्रेस पक्ष व नेते सत्ता म्हणजे खानदानी जहागिरी समजतात. त्यांना हद्दपार केले पाहिजे. पूर्वी काँग्रेसच्या राजवटीमध्ये अन्नधान्य गोदामात सडत होते. भिजत होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत जाब विचारल्यानंतर तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप करू नका असे सांगितले होते. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांना धान्य मोफत मिळत आहे. संपत्ती व मंगळसूत्राचे एक्स-रे काढून काँग्रेस राजवट आली तर ते छापे मारून या संपत्तीचे लूट करतील . असे ही त्यांनी सांगितले .
साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज व मतदारांची आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. ही शौर्याची भूमी आहे. नौदलाच्या दिनानिमित्त शिवमुद्रा प्रथमच लावण्यात आलेले आहे. कलम ३७० हटवला असून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लिफ्ट इरिगेशन व इतर अनेक योजना महायुतीने पूर्ण केले आहेत. पुढील पाच वर्षात सर्व प्रकल्प पूर्ण केले जातील. असे त्यांनी स्पष्ट केले शिवरायांचे किल्ल्याचे सुशोभीकरण करणार असल्याने ७ मे रोजी सर्वांनी कमल चिन्हाचे बटन दाबून कमळ फुलवावे व मतदानासाठी लोकांना प्रस्तुत करावे असे स्पष्ट केले. व्यक्तिगतरीत्या सभेला जमणाऱ्या सर्व लोकांनी घरातील लोकांना माझा नमस्कार पोचवावा अशी त्यांनी विनंती केली. या सभेला मोठ्या संख्येने पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, वाई ,सातारा, कोरेगाव, खटाव, तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण, माण -खटाव येथील महायुतीचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.