आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-वृक्ष लागवड व संवर्धन पर्यावरण बचाव चळवळ हीच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी उत्तम पर्याय — ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव वार्ताहर कोडीराम नेहे वृक्ष लागवड व संवर्धन पर्यावरण बचाव चळवळ हीच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी उत्तम पर्याय असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणवादी विचावंत पदमभूषण डॉ आण्णासाहेब हजारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे तीन दिवसीय “सहावे” वार्षिक संमेलन नुकतेच साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या श्री साई शताब्दी आश्रम मंडपात संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत मॅडम यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने 29 जिल्ह्यातुन आलेल्या पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाले,त्याप्रसंगी अनेक मान्यवर यांच्यासह राष्ट्रपती पदक विजेते आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील ,साईबन अहमदनगरचे संस्थापक डॉ प्रकाश कांकरिया रेकॉर्ड ऑफ बुक नोंद झालेल्या श्री जन्माचे करुया या चळवळीच्या जनक प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ सुधा कांकरिया , मंडळाचे सल्लागार व भारतीय नद्या जोड प्रकल्पाचे सदस्य राज देशमुख साहेब, जिल्हा उपवनसंरक्षक सौ सुवर्णा माने , राज्याचे प्राथमिक विभागाचे मा शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर साहेब प्रा पी एस भोसले आदींच्या उपस्थितीत नैसर्गिक ,मानसिक , सामाजिक व वैचारिक पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन लाभले. होते त्यावेळी पदमभूषण डॉ आण्णासाहेब हजारे हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक व मार्गदर्शक आदरणीय आण्णांची अचानकपणे प्रकृती अस्वस्थता जाणवल्याने आण्णांच्या अनुपस्थितीत हे संमेलन पार पडले , तरी ही आण्णांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मंडळाला 40 ते 45 पूर्वीपासून म्हणजे राष्ट्रपती पदक विजेते व वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे संस्थापक अध्यक्ष ह्यात होते तेव्हापासून तर आजपर्यंत आहेच व भविष्यात देखील राहील असे त्यांनी उपस्थित पदाधिकारी यांना आश्वासित केले , निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या वतीने सहाव्या पर्यावरण संमेलनाची माहिती ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणवादी विचारवंत पद्मभूषण डॉ.आण्णासाहेब हजारे यांना देवून त्यांचा “सन्मानचिन्ह” देवून यथोचित सन्मान मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे,कार्याध्यक्ष प्रमोद काकडे , राज्य प्रमुख संघटक आदर्श शिक्षक अनिल लोखंडे उपाध्यक्ष प्रकाश केदारी , नगर जिल्हा अध्यक्ष तुकाराम अडसूळ सर , राज्य कार्यकारिणी संघटक दिलीप धावणे शिवाजी झावरे ,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विजय बोडखे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अर्जुन राऊत ,सुभाष कोंडेकर , पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक सुभाष वाखारे सर आदिच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांचेशी पर्यावरण संमेलन बाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली. मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे पर्यावरण संमेलन शिर्डी येथे प्रकाशित केलेल्या “वनश्री विशेषांक” देऊन त्याबद्दल आण्णांना सखोल माहिती दिली.यावेळी पत्रकार विजय बोडखे सुभाष कोंडेकर यांनी आण्णांची थोडक्या शब्दात मुलाखत घेतली त्यावर त्यांनी पर्यावरणाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले की पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व शोषण थांबले पाहीजे कारण ते अतिशय भयानक आहे त्याचा दुष्परिणाम म्हणूनच दिवसेंदिवस समुद्राची जलपातळी वाढत आहे ,हिमनद्या वितळत आहेत त्यामुळे वातावरणातील तापमान वाढ होत आहे ,ओझोन पातळी कमी होत आहे ,त्याचे मानवी जीवनावर घातक दुष्परिणाम होत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले , याची शासन पातळीवरून कार्यवाही व्हावी व चळवळ मोठया प्रमाणात वाढ व्हावी यासाठी शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे , यासर्व बाबतीत दुर्दैवाने काही सकारात्मक होत नाही. अशी खंत अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केली , आण्णांनी मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन हे पर्यावरणाचे काम असे चालू ठेवावे असे आव्हान उपस्थित वृक्षप्रेमींना त्यांनी केले फोटो पद्मभूषण डॉ.आण्णासाहेब हजारे यांना “सन्मानचिन्ह” देवून सन्मान करताना अध्यक्ष प्रमोद मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे सदस्य प्रमोद काकडे सुभाष वाखारे अनिल लोखंडे प्रकाश केदारी तुकाराम अडसूळ दिलीप धावणे शिवाजी झावरे विजय बोडखे अर्जुन राऊत सुभाष कोंडेकर दिसत आहे