राहता:-नांदूर्खी बु.व इतर राहाता तालुक्यात मुसळधार पावसाच्या पाण्याने शेती,गाई गोठा व घरात पाणी शिरल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
वसंतराव पा.काळे
पत्रकार
राहाता- नांदूर्खी बु.
ता.२०।१०।२२
संपूर्ण राहाता तालुक्यात नांदूर्खी बु.गावासह इतर आसपासच्या सर्व परिसरात आस्मानीचे तांडव-आकांक्षांचा विध्वंस…
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नांदूर्खी बु. गावात अनेक शेतकऱ्यांच्या शेताची तर नासधूस झालीच परंतु पूरसद्रुश पावसाचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या गाईंच्या गोठ्यात व अनेक घराघरांत पाणी शिरले.व त्यामुळे खूप अशी मोठी आर्थिक हानी झाल्यामुळे ऐन दिवाळीच्या वेळेला लोकांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून वेळेवर पंचनामे करून मा.तहसीलदार साहेब श्री.कुंदन हिरे साहेब यांच्याकडे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्तिचे कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थ करत आहेत.त्याचप्रमाणे इतर राहाता तालुक्यातील जवळपास सर्व परिसरात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाच्या तांडवाने काल रात्री राहाता तालुक्यातील सामान्य जनतेच्या सुखस्वप्नांचा अक्षरशः पालापाचोळा केला.
खळाळून वहाणा-या ओढ्या नाल्यात तो वाहून देखील गेला….
कानठळ्या बसविणा-या वीजांचा कडकडाट अन लखलखाट…
रात्र नव्हे काळरात्रच ती…
अतिवृष्टी अन ढगफुटी हे शब्द फिके पडले भाऊ…
सोंगलेल सोयाबीन डोळ्यादेखत लागल वाहू…
गंजीत घुसल पाणी आणि सोंगायच राहील त्याला मिळाली जलसमाधि…
शेताचे झाले तलाव मग शिल्लक राहीलच काय ?
आधीच टेकला होता शेतकरी, होता पुरता हतबल…
त्यावर कोसळली हि अस्मानी….
तहसिलदार कुंदन हिरे साहेब सांगत होते….
राहाता परिसरात सहा इंच पाऊस(१५५मीमी)
शिर्डीत शंभर मीमी, लोणी बाभळेश्वर अन पुणतांबा साठ मीमीच्या पुढे….
आॅक्टोबरच्या मध्यावर ढगफुटी….
हा पाऊस कसला हा तर अवकाळी…
भयाण परिस्थीती….
कुठ गुरढोर वाहीली, कुठ शिरल घरात पाणी…
गांवोगावच्या रस्त्यांची पुरती दाणादाण उडाली..
हि तर आणीबाणी…
आटून गेलय आता शेतकरी अन गोरगरीबांच्या डोळ्यातल पाणी…
दुधाच्या भरलेल्या किटल्या आज तशाच राहील्या पडून, रस्तेच गेलेत ना हो वाहून….
शिर्डी ते नगर नावापुरताच उरलाय महामार्ग…
जडवहातुक वळवल्याने मुडद्यागत निपचीत पडला होता बिचारा…
कालचा पाऊस खुशाल मुदड्यावरूनच लागला की हो वाहू…
आधी सुतक पडल होत जडवहातुकीला…
आता तर सोशल मिडीयावर या तथाकथीत महामार्गाचे दशक्रिया विधी देखील लागले होते झळकू….
रस्त्याचा मुडदा पडल्यापासून शिर्डीतली गर्दी अन अर्थिक उलाढाल मंदावली…
हे कमी होते म्हणून की काय काल रात्री अस्मानी कोसळली…
दुर्दैवाचे दशावतार….
उध्वस्त स्वप्नांचे तांडव….
रो रो आवाज करीत वहाणारे ओढेनाले…
शेतात साठलेल्या पाण्यात बुडालेला भविष्यकाळ…
भल्या पहाटे पासून शिरकांड्याचा ओढा, पिंपळसात, अन पिंपरी निर्मळात या महामार्गावर नसलेली ट्राॅफीक जाम झाली ना भाऊ…
रस्त्याचे ओढे अन ओढ्यांच्या झाल्यात नद्या….
दिवाळी सुरू होण्यापूर्वीच काल आकाशात सुतळी अॅटमबाॅम्ब फुटले….
दिवाळी अशीच सादळली तर फटाके विकणार कसे फटाकेवाले चिंता करीत सुटले…
सखल भागातील उपनगरात घराघरात शिरले पाणी…
दिवाळीच्या तोंडावर परिस्थीती झाली दिनवाणी…
दिवाळीच्या तोंडावर दुकानात भरलेला माल तरी विकेल की नाही चिंता लागली. नांदूर्खी बु.गावातील अति वरिष्ठ ग्रामस्थांकड या पावसा संदर्भात विचारपूस केली असता सर्व वयस्कर व्यक्तिनी मझ्याशी बोलताना सांगितले कि पन्नास वर्षांपासून आम्ही शेती करतोय.पण
एवढे नुकसान आणि भयाण पाऊस अनुभवला नाही भाऊ…
शेतीवर अवलंबून राहू नका नाहीतर देशोधडीला लागाल असा संदेश दिलाय कालच्या काळरात्रीने…
उध्वस्त केलीत स्वप्ने, पणती, रांगोळी, लक्ष्मी(केरसुणी) अन पुजेचे साहित्य विकणा-या सामान्य विक्रेत्यांची…
आता कशाला देता हो पंचनाम्याचे आदेश…
बैठका नकोत आणि प्रस्तावही नकोत नकोत त्या वांझोट्या घोषणा आता…
सरसकट भरपाई द्या की हो उध्वस्त शेतक-यांना…
ती भरपाई उंदराच्या लेंडी एवढी नको…
डोंगर फोडून उंदिर काढायचा खटाटोपही नको…
सरसकट एकरी पस्तीस हजार रूपये द्या…
तरच वाचेल तो, अन करेल खटपट शाश्वती नसलेल्या रब्बी हंगामाची…
कालच्या भयाण काळरात्रीने सामान्य शेतक-यांच्या आशा आकांक्षावर अन दिवाळीच्या आनंदावर अक्षरशः ओतलेय पाणी…
तेल गेले, तुपही गेले हाती राहीले धुपाटणे….
उध्वस्त झालाय शेतकरी…
नष्ट झाले सारे शिवार…
सारे काही संपले आहे…
तरणे कठीण झाले आहे…
*वसंतराव पा.काळे*
प्रहार राहाता तालुका संघटक
RPS PRESS REPORTER
९७६७६५३३०९