कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-नोकर भरती सातारा जिल्हा बँकेची पण परीक्षा होतीय संचालकांची….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

नोकर भरती सातारा जिल्हा बँकेची पण परीक्षा होतीय संचालकांची….

सातारा दि: सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असे १०८ पुरस्कार प्राप्त सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक व शिपाई पदाची नोकर भरती सुरू झालेली आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या जिल्हा बँकेच्या सेवेसाठी सध्या मोठ्या प्रमाणात ६० शिपाई व २६३ लिपिक पदासाठी भरती होत आहे. या दोन्ही भरतीसाठी किमान ४० हजार अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोकर भरती सातारा जिल्हा बँकेची पण काही संचालकांना नाहक परीक्षा द्यावी लागत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थवाहिनी म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाहिले जाते. या बँकेचे चेअरमन नितीन लक्ष्मणराव जाधव पाटील व व्हाईस चेअरमन अनिल शिवाजीराव देसाई आणि विकास सेवा सोसायटीतून निवडून आलेले तसेच खरेदी विक्री संघ कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था नागरिक बँक नागरी पतपेढी गृहनिर्माण सहकारी संस्था दूध उत्पादक संस्था अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग महिला प्रतिनिधी कार्य लक्ष संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांच्यासह विशेष निमंत्रित सदस्य आणि प्रमुख वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांच्या विचार विनिमयाने ही नोकर भरती पारदर्शक होत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती ही नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले आहे. कारण, संचालकांच्या मर्जीनुसार यापूर्वी अनेकांची भरती झाली होती. आता मात्र वाढती बेरोजगारी व प्रत्येकांना नोकरीची अपेक्षा यामुळे आता जिल्हा बँकेची नोकर भरती ही स्पर्धा परीक्षेतूनच निवडली गेली जाणार आहे. तरीसुद्धा काहींना संचालकांच्या हाती ही निवड प्रक्रिया होणार असल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळे अनेक संचालकांच्या घरी भेटणाऱ्यांची दररोजची संख्या १००ते १५० पर्यंत वाढलेली आहे. त्यांचा चहापान करताना काही संचालकांना फुकटचे दुखणे सहन करावे लागत आहे. प्रत्येकाच्या गाठीभेटी व समस्या ऐकण्याबरोबरच जिल्हा बँकेच्या नोकर भरती बाबतही खुलेपणाने चर्चा होऊ लागलेली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या काही संचालकांना चांगलीच परीक्षा द्यावी लागत आहे. आपल्या भागातील कुणी नाराज होऊ नये. प्रत्येकाचे समाधान करण्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला गेल्यानंतर जिल्हा बँकेच्या संचालकांना अनेकांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत आहे. इथूनच मग जिल्हा बँकेच्या नोकर भरती मध्ये आपल्यावर कृपादृष्टी असावी असाही प्रयत्न केला जात आहे. मुळातच जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया ही एका खाजगी एजन्सीकडे देण्यात आलेली आहे. या ठिकाणी उत्तर पत्रिका प्रत्येक उमेदवाराच्या खात्यावर दिसणार आहे. त्यामुळे कुठेही कॉपी करणे अथवा पार्सिलिटी करणे जमणार नाही. हे त्रिवार सत्य आहे.
काही स्पर्धा परीक्षेमध्ये पहिले ५० प्रश्न व त्याचे उत्तर ही सम किंवा विषम प्रमाणात दिली जातात. त्याकडे लक्ष केंद्रित करून काही उमेदवारांना याची यापूर्वी माहिती मिळत असल्याने लेखी परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतात. याचाही अनुभव काहींनी सांगितलेला आहे. यामध्ये सत्य असले तरी स्पर्धा परीक्षेला संचालक बोर्डासाठी दहा गुण असून त्यापैकी पाच गुण हे शैक्षणिक गुणवत्तेसाठी आहेत. तर इतर पाच गुण संचालकांच्या म्हणण्यानुसार देण्यात येणार आहे. तरीसुद्धा एकूणच परीक्षेचे गुण व संचालकांच्या हाती असलेले गुण यामुळे काहींची गुणवत्ता कमी किंवा वाढली जाणार आहे . त्यामध्ये फारसं परिणामकारक निकाल लागू शकत नाही. ही नोकर भरती एजन्सी व काही जबाबदार संचालकाच्या निगराणीखाली होत असल्याने अनेक इच्छुक उमेदवार व त्यांचे पालक हे संचालकांच्या गाठीभेटी घेऊन आपल्या पाल्याचे नशीब आजमावत आहेत. त्यामुळे आता संचालकांच्या मोबाईलवर पूर्वी पाच-पन्नास जण संपर्क ठेवत होते. आता तो आकडा अडीचशे ते तीनशे वर गेल्यामुळे संचालकांच्या मोबाईलची बॅटरी दुपारपर्यंतच कमी होऊ लागलेली आहे. असं काही संचालकांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना सांगितले . एका जाणकार संचालकांनी सांगितले की लोकप्रतिनिधी असल्यामुळे दररोज मतदार संघातील भेटणाऱ्यांची संख्या ही जास्त असते. कारण, मतदारसंघातील विकास कामे व इतर कारणासाठी लोक भेटत असतात. आता यामध्ये नोकर भरतीसाठी काही पालक व हितचिंतक भेटत असले तरी ही नोकर भरती पारदर्शक होणार आहे. नोकर भरती बाबत संचालकांना भेटून फारसा फरक पडणार नाही. असे सांगण्यात येत आहे. काहींनी यापूर्वीच्या नोकर भरती बाबत ज्यांची जिल्हा बँकेमध्ये नोकर भरती झालेली आहे. त्यापैकी काहींनी अर्थकारणाचा अभ्यास करूनच बँकिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. हे सुद्धा यानिमित्त नमूद करावे वाटत आहे. दरम्यान, या नोकर भरती प्रक्रिये बाबत कंपनीला किती निधी व बँकेला किती निधी मिळणार? ही आकडेवारी या नोकर भरतीच्या प्रक्रियेनंतर समजणार आहे..
……. …….. ……………………….
चौकट — सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्वायत्त संस्था असून यावर राज्य सरकारचे नियम व अटी लागू शकत नाही . कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. त्यामुळे दिव्यांग, अनुकंपा व इतर आरक्षण नसल्याने गुणवत्तेच्या आधारावर भरती होईल. यावर विश्वास ठेवण्यास सध्या तरी कुणी तयार नाही. वास्तविक पाहता सर्वच संचालक हे या नोकर भरती प्रक्रिया केव्हा पूर्ण होईल. याकडे लक्ष ठेवून आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button