वाई:-किसन वीरमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
किसन वीरमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा.
वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे, मराठी विभाग, वाङ्मय मंडळ व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर कला, वाणिज्य व विज्ञान विभागांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रा. डॉ. विनोद वीर, मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या विवेचनात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागली पाहिजे. दिवसातील काही तास हे वाचण्यासाठी राखून ठेवले पाहिजेत. ग्रंथांचे वाचन करताना, त्याबाबतच्या नोंदी ठेवाव्यात, म्हणजे भविष्यकाळात त्याचा उपयोग होतो. सातत्याने वाचन केल्यास त्याचे रूपांतर ज्ञानात होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे स्वतःकडे पुस्तके नसल्याने दुसऱ्यांच्या घरी जाऊन पुस्तकांचे वाचन करीत होते. आशा महान व्यक्तींचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाचनाचा ध्यास घेतला पाहिजे. आज इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पुस्तके सहज उपलब्ध होतात, त्यांचे जाणीवपूर्वक वाचन, मनन झाले, तर आपले विचार व आचार समृद्ध होतील.
वाङमय मंडळाचे समन्वयक डॉ. सावंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपले व्यक्तिमत्त्व संपन्न होण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनासाठी कोणत्याही विषयाचे बंधन असता कामा नये. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगताना म्हणाले, ‘वाचन प्रेरणा दिन’ एक दिवस साजरा करून वाचनसंस्कृती वाढीस लागत नाही, तर खरी प्रेरणा अंतःकरणातून निर्माण झाली पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या निमित्त विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके देऊन त्यावर प्रत्येकाला वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलायला लावले. या अंतर्गत कु. निकिता सूर्यवंशी, कु. वैष्णवी महांगडे, कु. संतोषी काळे, कु. श्वेता वरखडे, श्री. अनिकेत वाडकर, श्री. गणेश कदम या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अरुण सोनकांबळे यांनी केले तर आभार सहा.ग्रंथपाल श्री. धनंजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. अमोल कवडे, डॉ. चंद्रशेखर भारती, श्री. विशाल डांगिस्ते, श्री. सुरज यादव, श्री. सुमंत सावंत व श्री. जितेंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.