मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी भेट जाहीर
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सर्व पात्र
शिधापत्रिकाधारकांना दिवाळी भेट जाहीर
मुंबई, दि. 5 (शफिक शेख):- कोरोना आणि महागाईच्या प्रचंड चटक्यांनी त्रासलेल्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी दिवाळी भेट जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यांतील गरीब जनतेला एक दिलासा मिळाला आहे. आणि त्यामुळे थोडया प्रमाणात का होईना राज्यातील जनतेची दिवाळी ‘‘गोड’’ होण्यास मदत झाली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जाहीर केले आहे की, दिवाळी सणासाठी विशेष भेट म्हणून सर्व अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील दारिद्रय रेषेवरील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतक-यांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसाचा एक संच 100 रूपये प्रतिसंच या दराने देण्यात येणार आहे.
सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 283/व्यय10, दिनांक 3/10/2022 च्या अन्वये सहमती दिली असून या संचांच्या खरेदीसाठी 513.24 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. आणि त्यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे एनईएमएल एनसीडीईएक्स ग्रुप ऑफ कंपनी यांच्याकडून हे संच खरेदी केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. परंतु याआधी ज्या शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडण्याचे फॉर्म भरले होते त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त होत असून मा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठीही काही उपाययोजना करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.