राहता:-माहिती अधिकारामुळे न्याय व हक्काची जाणीव: प्राचार्य नानासाहेब शेळके.
प्रतिनिधी बाबासाहेब अंत्रे राहता:-9890557798

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
माहिती अधिकारामुळे न्याय व हक्काची जाणीव: प्राचार्य नानासाहेब शेळके.
राहाता (वार्ताहर) : माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ सार्वजनिक क्षेत्रातील नागरिकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव देणारा कायदाआहे. या कायद्याने नागरिकांना आपल्या न्याय व हक्काची जाणीव होते, असे प्रतिपादन प्राचार्य नानासाहेब शेळके यांनी केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पर्यवेक्षक देवराम वडीतके यांनी केले. या दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण प्राचार्य नानासाहेब शेळके, मुख्याध्यापिका ज्वाला कांबळे, पर्यवेक्षक देवराम वडीतके, ज्ञानदेव माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या निबंध स्पर्धेत लहान गटात ओम नवगिरे, चेतन सोनवणे, यश कदम, वेदांती कडू, तनुजा भालेराव, समीक्षा सोनवणे तर मोठ्या गटात रिद्धी औताडे, श्वेता त्रिभुवन, कोमल ढोकणे, वैष्णवी गोल्हार या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. शरद दुधाट, शोभा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य शेळके यांनी माहिती अधिकार कायद्याची गरज, नागरिकांच्या न्याय व अधिकाराची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ज्ञानदेव माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट यांनी केले.