मायणी:-मायणी परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पीक परिस्थिती गंभीर.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मायणी परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पीक परिस्थिती गंभीर.
मायणी प्रतिनिधी___गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला पाऊस अद्यापही उघडला नसल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे तसेच खरीप हंगामातील पीक परिस्थिती गंभीर झाली असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी दिलीप दाभाडे यांनी तरुण भारतची बोलताना दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की मायणी परिसरातील अनफळे मायणी दातेवाडी निमसोड या परिसरात सुरुवातीच्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी वाघ्या घेवड्याची लागण केली. सध्या वाघा घेवडा काढणीला आला असून या संततधार पावसाने घेवड्याच्या शेंगा कुजूनगेलयाआहे त्यावर बुरशी चढली आहे तर मूगव उडीद यांची परिस्थिती तीच झाली आहे शेतामध्ये काँग्रेस व इतर गवताने आपले साम्राज्य मांडले आहे सोयाबीन मका सोयाबीन मका व भुईमूग या पिकांची स्थिती थोडी बेताची आहे या संततधार पावसामुळे शेतकऱ्याच्या तसेचरोजगारांच्या हाताला काम नाही पावसाच्या या धिंगाण्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे आता सूर्यप्रकाशाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.