साताऱ्यात एकच वादा,,,, पवार साहेबांविना नको रे दादा,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात एकच वादा,,,, पवार साहेबांविना नको रे दादा,,,
सातारा दि:छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी २४ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळेला महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिसाद सातारा जिल्ह्यातून मिळाला होता .आजही अजित दादा पवार यांच्या बंड्यानंतर पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात पवार साहेबांना मानणारा गट व कार्यकर्ता पवारांची साहेबांच्या पाठीशी ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. सातारा जिल्ह्यात एकच वादा साहेबांविना नको रे दादा,,,,,, अशा पद्धतीने आता राजकारणाची पुढील दिशा ठरवण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील नांदवळ ता. कोरेगाव या मूळभूमीतील शरदचंद्र पवार साहेब हे कालांतराने पुणेवासी झाली होते. परंतु सातारा जिल्ह्याबद्दल त्यांचे असणारे प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व किसन वीर यांच्या सोबतच अनेकांचे आशीर्वाद घेऊन शरदचंद्र पवार साहेब यांनी राजकारणामध्ये खूप मोठी मजल मारली. सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच सातारा जिल्हाध्यक्ष पद व नंतर सातारचे खासदार पदवी भूषवले होते. नंतर अभय सिंहराजे भोसले व विशेषता रामराजे नाईक निंबाळकर, भाऊसाहेब गुदगे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, श्रीमती डॉ.शालिनीताई पाटील, खा.श्रीनिवास पाटील,बाळासाहेब पाटील, विक्रम सिंह पाटणकर नितीन बानगुडे- पाटील, बाळासाहेब भिलारे, आ.सदाशिव पोळ,आ .मकरंद पाटील, जितेंद्र पवार, नलिनी जाधव , पिंटू गायकवाड, गोपाळ बेलोशे,विजय शेटे,व अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकारला होता. सध्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल झालेले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली असून एकच वादा,,, साहेबांविना नको रे दादा ,,,,,,असे आता राष्ट्रवादी काँगेस कार्यकर्त्यांना सांगावे लागत आहे .
सातारा जिल्ह्यातील आ . शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ . मकरंद पाटील, सत्यजीत पाटणकर , तेजस शिंदे ,दिपक पवार,जावलीचे अमित कदम, जावळी तालुकाध्यक्ष भानुदास भोसले,प्रदीप शिंदे, ,कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम, राजकुमार पाटील, शफीक शेख, महाबळेश्वरचे संजय गायकवाड, खटाव तालुक्यातील श्रीमती शशिकला देशमुख, विद्यार्थी संघटनेचे अतुल शिंदे, राष्ट्रवादी रहिमतपूर अल्पसंख्याक अध्यक्ष , कापड बाजार कामगार नेते जयवंतराव पिसाळ , सुनिल फरांदे, शरद शिंदे, प्रा .पार्थ पोळके अशा अनेकांनी राष्ट्रवादीसोबत राहण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचे स्वागत केले जात आहे. फलक व घोषणाबाजी ने सातारा शासकीय विश्रामगृहातील गर्दी म्हणजे सातारा जिल्ह्याने शरदचंद्र पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्धार केला आहे. हे सुद्धा दिसून आले आहे.
———————————————————
फोटो – सातारा शासकीय विश्रामृहात राष्ट्र वादी नेते श्री शरद पवारांना मानणारा वर्ग (छाया – अजित जगताप, सातारा)