निगडी :-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘‘नियोजनशून्य” कामकाजाचा सेक्टर 22 ला फटका.
प्रतिनिधी:- शफिक शेख निगडी:-9767275783

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या
‘‘नियोजनशून्य” कामकाजाचा सेक्टर 22 ला फटका
पुणे, निगडी, दि. 14 (शफिक शेख)ः- आश्यिा खंडातील सर्वात ‘श्रीमंत’ आणि ‘स्मार्ट सिटी’च्या गौरवाने सन्मानित पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आपल्याच अखत्यारीतील नियोजनशून्य कामकाजाला आळा घालू शकत नाही आणि त्याचाच फटका सेक्टर नंबर 22 मधील महिला, लहान मुले, रूग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांना बसत आहे.
येथील सेक्टर नंबर 22 मधील फातिमा मशिद, अंजुमन हौसिंग सोसायटी, यमुनानगर शासकिय रूग्णालय, आझाद चौक आणि गजबजलेल्या भाजीमंडई मधील मागील अनेक वर्षांपासून वैध असलेले गतिरोधक अचानक अवैध झाले आणि फ क्षेत्रिय विभागाच्या कर्तव्यक्ष आणि आपल्या कार्यामध्ये निपुण असलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी आपल्या कामाप्रति निष्ठेचे उदाहरण देत कुठलेही नियोजन न करता अचानक 10 दिवसांपूर्वी वरील सर्व ठिकाणचे गतिरोधक निकृष्ठ पद्धतीने आणि अर्धवट तोडून टाकले.
मशिदीमध्ये जाणा-या मुस्लिम बांधवांची, अंजुमन सोसायटी मधील लहान मुले, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, यमुनानगर हॉस्पिटलमधील रूग्ण, गरोदर स्त्रिया, आझाद चौकामधील नागरिक, भाजीमंडईमधील नागरिक यापैकी कोणाचीही पर्वा न करता आपल्या ‘‘उच्च’’प्रतीच्या कामाची जाणीव फ क्षेत्रिय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांना करून दिली.
जर हे गतिरोधक अवैध होते तर त्याची परवानगी दिली कोणी? एका गजबजलेल्या रहिवाशी जागेतील गतिरोधक हे कोणतेही पूर्वनियोजन न करता काढण्याचे आदेश दिले कोणी? आणि आता हे गतिरोधक काढल्याने होणा-या अपघातांस जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या विभागातील नागरिक विचारीत आहेत. हे गतिरोधक काढण्यापूर्वी त्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असताना अशा प्रकारे एका नवख्या आणि शिकावू कामगारासारखे हे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उच्च अधिका-यांनी केले आहे.
लवकरात लवकर या ठिकाणी जर गतिरोधक बसविण्यात आले नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
यामध्ये नगरसेवकांचा काही हस्तक्षेप नाही – श्री. चिखले
सदर प्रकरणी तत्कालीन नगरसेवक श्री. सचिन चिखले यांना विचारले असता त्यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले की, सदर आदेश हे मुख्यमंत्र्यांकडून आले असून त्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही. आणि नवीन परवानगी घेवून व पावसाळा संपेपर्यंत कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचे श्री. चिखले यांनी सांगितले.