सातारा:-दोन नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री राजेशिर्के यांनी केले साताऱ्यात अन्नदान….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
दोन नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री राजेशिर्के यांनी केले साताऱ्यात अन्नदान….
सातारा दि २६ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उप मुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा येथील माजी उपनगराध्यक्ष व खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुहास राजेशिर्के यांनी येथील भिक्षेकरी गृहामध्ये अन्नदान केले . कोणत्याही प्रकारे फ्लॅक्स बाजी न करता खऱ्या अर्थाने सेवादिन साजरा केला. यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी राहुल शिवनामे, शहर उपाध्यक्ष प्रशात जोशी यावेळी उपस्थित होते
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एकाच दिवशी हा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला . या निमित्ताने सातारा जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . येथील भिक्षेकरी गृहाच्या सर्व सदस्यांना अन्नदान करण्यात आले.
या उपक्रमाविषयी बोलताना विक्रम पावसकर म्हणाले. उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस व अर्थमंत्री आदरणीय पवार यांच्या वाढदिवस सेवादिनानिमित्त सुहास राजे शिर्के यांनी आयोजित केलेला अन्नदान उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे . सेवा हा माणुसकीचा धर्म आहे. हा उपक्रम मानवतावादी असून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातूनच माणसांची मदत केली जाऊ शकते . सुहास राजेशिर्के या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले, अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही. दोन उपमुख्यमंत्री यांचा हा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले होते. मानवाची भूक भागविणे त्यांचा आत्मा शांत ठेवणे.हे आपल्या हातून नकळत घडले असून त्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. सुहास राजे शिर्के मित्र समूहाच्या वतीने हा अन्नदान उपक्रम राबवण्यात आला. त्याचे भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक आणि व्यवस्थापन यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.
सातारा शहरातील अनेक महत्वाच्या आपत्ती मध्ये श्री राजेशिर्के यांनी सढळ हस्ते मदत केली आहे. इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे. त्यामुळे त्यांचे नाव सुहास ठेवण्यात आले आहे. तसेच ते दिलदार राजा सारखे मदत करतात म्हणून त्यांच्या नावात राजे शब्द आले आहेत. असे सामाजिक कार्यकर्ते हेमंत कदम यांनी सांगितले.
________________________________________फोटो – सातारा येथील भिक्षेकरी मध्ये अन्न वाटप करताना श्री राजेशिर्के व पावसकर (छाया – अजित जगताप,सातारा)