जावळी:-मुनावळे झाले पर्यटन स्थळ पण भूमिपुत्रांना ना जमीन ना घर.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
मुनावळे झाले पर्यटन स्थळ पण भूमिपुत्रांना ना जमीन ना घर.
मुनावळे दि: पर्यटन म्हणजे भ्रमंती आहे. आज अनेक पर्यटक सातारा जिल्हा जावळीतील मुनावळे येथील निसर्गरम्य परिसरात येतात. मनमुराद आनंद घेतात. परंतु येथील स्थानिक भूमिपुत्रांची व्यथा कोण समजून घेत नाहीत .ज्या भूमिपुत्रांनी इथल्या निसर्गाचे व साधनसामुग्रीचे जतन केले. आज त्यांनाच हक्काची जमीन व घर नसल्यामुळे त्यांची अवस्था बिकट झालेली आहे.
याबाबत माहिती अशी की कोयना धरणामुळे कोयना जलाशयाची निर्मिती झाल्यामुळे येथील अनेकांना भूमीचा त्याग करून पुनर्वसीत व्हावे लागले. अंशाता कोयना जलाशयामुळे बुडीत झालेल्या लोकांनी पुन्हा याच भूमीत जलाशयापासून अंतर ठेवून घर बांधलेले आहे. तसेच शेती सुद्धा करत आहेत. परंतु शासकीय पातळीवर त्याची कुठेही नोंद नसल्यामुळे ना घर का ना घाट का ना जलाशयात अशी बिकट अवस्था झालेली आहे.
या भागातील भूमिपुत्र व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे या भागातील भूमिपुत्रांच्या अशा पल्लवीत झालेले आहेत. गेल्या वर्षी जल पर्यटनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. एका वर्षात सर्व प्रश्न मार्गी लागतील असे सांगितले. परंतु लाल फितीच्या दोरीमध्ये सध्या अनेक प्रस्ताव अडकून पडल्यामुळे ये लाल रंग कब मुझे छोडेगा अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे.
सध्या मुनावळे गावच्या हद्दीमध्ये ७० खातेदार राहत आहेत. या ठिकाणी प्राथमिक शाळा व इतर सुविधा असल्या तरी बँकेचे कर्ज प्रकरण म्हणा किंवा एखादी शासकीय योजना कार्यान्वित करायची असेल तर कागदपत्राची पूर्तता करावी लागते .परंतु मुळातच कुठेच नोंद नसल्यामुळे सातबारा कोरा झालेले महाराष्ट्रातील पहिले गाव आहे. यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ निलेश भोसले, बळीराम भोसले, किशोर भोसले, किसन भोसले, आनंद पाटील, विलास भोसले, विष्णू भोसले, गणेश भोसले, किरण भोसले, विठ्ठल भोसले, बाप्पू भोसले, दगडू भोसले, श्रीपती भोसले, राहुल भोसले, संदीप जांभळे, प्रदीप जांभळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची दोन वेळा भेट घेतली आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तेच खऱ्या अर्थाने गती देतील असा विश्वास स्थानिक भूमिपुत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुनावळे येथे साली ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतले व याबाबत तातडीने निर्णय घेण्याची सूचना संबंधित विभागाला दिल्यामुळे मुनावळे गावचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ………………………. ……..
फोटो मुनावळे येथे ग्रामस्थांशी चर्चा करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पोलीस अध्यक्ष समीर शेख सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व ग्रामस्थ चर्चा करताना (छाया- अजित जगताप, मुनावळे)