वाई:-विकास, विश्वास आणि भक्कम जनसंपर्काचं नेतृत्व – वाई पश्चिम भागात ‘लोकनेते’ म्हणून ओळख निर्माण करणारा चेहरा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

विकास, विश्वास आणि भक्कम जनसंपर्काचं नेतृत्व – वाई पश्चिम भागात ‘लोकनेते’ म्हणून ओळख निर्माण करणारा चेहरा.

वाई पश्चिम भागात विकासकामांची ठोस दिशा, कार्यकर्त्यांचा मजबूत फळीबंध आणि जनतेशी थेट नाळ जोडणारं नेतृत्व आज ठळकपणे पुढे येत आहे. कामाच्या जोरावर मिळालेली ‘लोकनेते’ ही ओळख ही केवळ पदवी नसून, जनतेच्या विश्वासाची पावती असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
“माझं काम पाहून लोकांनीच मला लोकनेते ही पदवी दिली. कार्यकर्त्यांना दिलेलं पाठबळ आणि त्यांनी दिलेली साथ, हीच माझ्या कामाची खरी पोचपावती आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
यशवंतनगर गटात पाण्याच्या टाक्या आणि रस्त्यांची कामे करताना लोकांच्या मूलभूत गरजांनाच प्राधान्य देण्यात आलं. उंच–सखल भागामुळे महिलांना पाण्यासाठी लांब अंतर कापावं लागत होतं. ही अडचण ओळखून पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आली. यामुळे महिलांचे कष्ट कमी होऊन शेतीकडे अधिक लक्ष देता येऊ लागलं, तर रस्त्यांमुळे दळणवळणाचा मार्ग मोकळा झाला.
शिक्षण आणि अध्यात्म या दोन्ही बाबींना त्यांनी समान महत्त्व दिलं. परिसरातील शाळा केवळ प्राथमिक स्तरापुरत्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर जावं लागत होतं. ही गरज ओळखून हायस्कूलची निर्मिती करण्यात आली. तसेच, धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी मंदिर उभारणीद्वारे अध्यात्मिक बळही वाढवण्यात आलं.
आजवर अनेक कार्यकर्ते घडवणाऱ्या या नेतृत्वाचा नव्या पिढीला स्पष्ट संदेश आहे—“लोकांच्या मदतीला जा, त्यांच्या सुख–दुःखात सहभागी व्हा. मकरंद आबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या प्रेरणेतून सेवा आणि निष्ठेचे कार्यकर्ते घडले पाहिजेत.”
पूर्वी केलेलं विकासकाम, आबांचं ठाम नेतृत्व आणि जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर यशवंतनगर गटात विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकांनी पाठबळ दिलं, तर हे इलेक्शन १०० टक्के जिंकणार—असा ठाम विश्वास या नेतृत्वातून दिसून येतो.




