बालपणीच्या आठवणी जाग्या करणारा स्नेहमेळावा साजरा.
प्रतिनिधी :-रफिक शेख पुणे :-90211 32121

बालपणीच्या आठवणी जाग्या करणारा स्नेहमेळावा साजरा…..
पुणे, दि. 20 (रफिक शेख) : बालपण कधी परत येत नाही परंतु गेट टुगेदर आणि स्नेहमेळाव्याने बालपणीच्या आठवणी जाग्या होतात हे मात्र नक्की, अशीच एक बालपणीच्या आठवणीतील स्नेहमेळावा संपन्न झाला.
श्री म्हाळसाकांत विद्यामंदिर पाल या शाळेतील सन 1993 ची बॅच एकत्र येऊन मित्र मैत्रिणींचा तीस वर्षानंतर म्हणजे वयाच्या 44 व्या वर्षी दहावीचे दुरावलेले मित्र मैत्रिणींनी कास-सातारा येथील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या ठिकाणी एकत्र येऊन स्नेहमेळाव्याने बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या.
कालचे हे बालकलाकार आज कोण अधिकारी, बागायतदार आहे तर कोण व्यावसायिक आहेत, कोण डॉक्टर, इंजिनिअर आहे तर कोणी विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुजन वर्ग आहेत.
यावेळी प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. जेणेकरून लहानपणाच्या चेहऱ्यात आणि आताच्या बघण्यात तीस वर्षाचा फरक होता. एकमेकांसाठी एक दुसर्याने केलेल्या मदतीचे बोल बोलले गेले.
आदर्श शिक्षकाप्रमाणे बेस्ट फ्रेंडचा सत्कार करण्यात आला. शिवाय मनोरंजनाचा कार्यक्रम सुध्दा याप्रसंगी झाला. एक दिवसाचा हा मेळावा असे वाटत होते की ही वेळ कधीच संपू नये.
असा हा स्नेहमेळावा वारंवार व्हावा असे प्रत्येकाच्या तोंडून बोलले जात होते. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. हा अविस्मरणीय क्षण आठवणीत राहण्यासारखा होता.