पुणे:-समता भूमीवर शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा -२०२५ कार्यक्रम पत्रिकाचे प्रकाशन सोहळा संपन्न !!!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
समता भूमीवर शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा -२०२५ कार्यक्रम पत्रिकाचे प्रकाशन सोहळा संपन्न !!!

पुणे /समता भुमी- शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा समिती, पुणे चे वतीने समता भूमीवरील महात्मा फुले वाडा येथे रविवार दि.२१.९.२०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री. शिवाजी मराठा संस्थेचे खजिनदार म.जगदीश जेधे आणि फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौन्डेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास राखी रासकर आणि सौ.सुनिता बोराटे यांचे शुभ हस्ते अर्पण करण्यात आले. त्यानंतर समितीचे वतीने दि.२८.९.२०२५ रोजी होणाऱ्या शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा-२०२५ कार्यक्रम पत्रिकाचे प्रकाशन सोहळा मा.जगदीश जेधे व समिती पदाधिकारी यांचे शुभ हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे प्रास्ताविक व कार्यक्रम रूपरेषा अरविंद खैरनार यांनी केले तर महात्मा फुले अखंडाचे गायन राखी रासकर यांनी केले आणि अड नीरज धुमाळ यांनी तीन कार्यक्रम एकत्र घेण्यामागचे कारणा विषयी मौलिक विचार मांडले.
यावेळी अड.मोहन वाडेकर ,अंजुम इनामदार ,कवी .बाबा जाधव ,प्रकाशक मोहिनी कारंडे, ,अजय कदम ,प्रा.अमृतराव काळोखे ,इलयास सय्यद ,आर.बी.माने ,मुकुन्द काकडे ,हनुमंत टिळेकर ,अप्पासाहेब गायकवाड ,सुरेश दरवडे आदि मान्यवर उपस्थितीत होते.
सोहळ्याचे समन्वयक मुकुंद काकडे यांनी शेवटी आभार मानले. त्यानंतर अड.मोहन वाडेकर यांनी सर्वासोबत पायी समताभूमी नजीक लहूजी वस्ताद तालीम,क्रांतिकारक उमाजी नाईक समाधी स्थळ आणि सत्यशोधक गुरुवर्य बाबुराव जगताप स्मारक, वेताळ पेठेतील गोविंदराव फुले यांचा मुशी कारखाना ठिकाण, यांना भेटी देत या क्रांतीकारकांची तसेच २४.९.१८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या विषयी व सत्यशोधक झेंडा ज्या ठिकाणी महात्मा फुले यांनी प्रथम फडकविला तो बानाकरवाडा भग्न अवस्थेत असलेला दाखवून त्यावेळच्या घटनेची देखील सखोल माहिती दिली .त्यावेळी रघुनाथ ढोक व इतर मंडळी म्हणाले कि पुणे मधील असे अनेक सत्यशोधकांचे ठिकाण आहेत ते प्रकाशित आणून हेरीटेज वाक सारखे भेटी देऊन त्या स्थळांची व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्व समाजापर्यंत पोहचविणे काळाची गरज आहे असे म्हंटले. तर अरविंद खैरनार म्हणाले की येत्या रविवारी २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सोहळ्यास सातारा,सांगली सोलापूर ,छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानागर,जळगाव ,धुळे परिसरातून देखील मोठ्या संख्येने सत्यशोधक मंडळी उपस्थित रहाणार आहेत. तर पुणे परिसरातील सत्यशोधक कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त उपस्थितीत रहावे असे आवाहन त्यांनी केले.




