ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पित्याचे छत्र नसलेल्या मुलीचे मा.राज्यमंत्री बच्चुभाऊ कडुन कन्यादान.राहाता तालुक्यातील सर्व प्रहार पदाधिकारी व राहाता तालुक्यातील सर्व नागरिकांमधून मा.बच्चुभाऊ वर कौतुकांचा वर्षाव.

प्रतिनिधी :- वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

!!कन्यादान आणि हळवे पालकमंत्री!!
मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हा बापाच्या आयुष्यातील कसोटीचा प्रसंग म्हणून नेहमीच वर्णिला जातो. नियतीने ज्या मुलींचे पितृछत्र हिरावून घेतले, त्या मुली ही वेदना अधिक जाणू शकतात. आज अशाच एका हळव्या प्रसंगात पालकमंत्री बच्चू कडू पहावयास मिळाले. एरवी आक्रमक, आंदोलक, निडर भासणारे पालकमंत्री याठिकाणी खूपच हळवे आणि भावूक भासत होते. मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हे प्रसंग मुलीच्या बापाच्या जीवनात कसोटीचे असतात ते यासाठीच!
चि.सौ. कां. दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील भास्करराव तराळे रा. व्याळा ता. बाळापूर आणि आई प्रमिला ह्या दोघांचे छत्र हिरावले गेलेले. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते.
तिचे मेव्हणे व मामा ह्यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरु केले. कंचनपूर ता. खामगाव जि. बुलडाणा चे विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रविण ह्यांच्या स्थळाचा होकार आला. आता लग्न समारंभ करुन देण्याचा प्रश्न आला. व्याळ्या जवळच हॉटेल मराठा चे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्यावतीने करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. समारंभपूर्वक लग्न पार पडले.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले; त्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण ह्यांच्या सुपूर्द केली. व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले. पित्याच्या मायेने जावई आणि लेक यांना आहेर केला. शुभाशिर्वाद देऊन मगच पालकमंत्री सोहळ्यातून बाहेर पडले.
मा.बच्चुभाऊंच्या या कार्याबद्दल आमचे पत्रकार प्रतिनिधी श्री.वसंतराव पा.काळे यांच्याशी बोलताना राहाता तालुक्यातील पदाधिकारी श्री.अभिजीत कलेकर,श्री.दिनेश राजे शेळके,श्री.वसंतराव काळे,श्री.नितीनराव भन्साळी,श्री.भाऊनाथ पा.गमे ,सुधाकर डांगे,अवि.सणांसे व इतर सर्व पदाधिकारी या सर्वांनी बोलताना सांगितले की आम्हाला अभिमान आहे की आम्ही सर्व एका अशा सामाजिक पक्षात आहोत की जेथे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त केले जाते.बच्चूभाऊंच्या पाऊलावर पाऊल ठेउनच आम्हीही आमच्या स्तरावर गोरगरिबांची कायम सेवा करतच राहणार व प्रहार पक्षाला बळकटी आणण्यासाठी गोरगरिबांची आम्हीही अशीच कायम सेवा करत राहणार.एक दिवस आम्ही बच्चुभाऊंना मुख्यमंत्री पदावर बसवणारच हा आम्हाला विश्वास आहे.अशी अनेक समाजकार्ये बच्चुभाऊ दररोज गोरगरिबांसाठी करतच असतात.असे कार्य बघुन राहाक्यात मा.बच्चुभाऊ यांना मानणारा मोठा वर्ग आता तयार होताना सगळीकडे दिसून येत आहे यात काही शंकाच नाही.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button