पारनेर:-‘गणराज “इस्पात कंपनीच्या धुरांमुळे -जगजीवन विस्कळीत,प्रदुशनात वाढ!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
‘गणराज “इस्पात कंपनीच्या धुरांमुळे -जगजीवन विस्कळीत,प्रदुशनात वाढ!
दि.३ पारनेर; (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील सुपा हे नगर पुणे हायवे रोडवर वसले असुन त्या ठिकाणी ४०ते ४५ गावांचा दळणवळणाचा दरडोई संबध येत असुन सुपा पंचक्रोशीतील सुपा औद्योगिक वसाहत ही मोठ्या प्रमाणात वसली असुन नवीन औद्योगिक वसाहत ही नगर पुणे हायवे लगत आसल्याने त्या ठिकाणी “गणराज” इस्पात कंपनी वसली आहे.त्या कंपनीच्या धुरांमुळे तेथील परीसरातील गावांचे जनजीवन अंधारमय झाले आहे .सदर कंपनीच्या धुरामुळे परीसरातील वातावरण अंधारमय झालेले दिसते.त्या मुळे प्रदुशनात वाढ झालेली दिसते.ही वस्तुस्थिती आज पहावयास मिळते.अनेक वेळा कंपनीला लेखी निवेदन देउन ही काहीही कार्यवाही झालेली दिसुन येत नाही .
विशेष म्हणजे गणराज इस्पात कंपनी ही नगर पुणे हायवे रोड लगत असल्याने सदर कंपनीच्या धुरांमुळे वाहन चालकांना वाहणे चालवतांना हायवे रोड दिसत नाही ,त्यामुळे आपघातांचे प्रमाण वाढलेले दिसते.
राजकिय मंडळींना अनेक वेळा लेखी निवेदन देऊन ही कंपनीवर कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही,राजकीय मंडळीनी तोंडावर बोट ठेवल्याचे चित्र दिसत आहे.कंपनीच्या धुरांमुळे प्रदुशनात वाढ होउन परीसरातील जन जीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.धुरांमुळे अनेक रोगांनाआमंत्रण दिल्यासारखे दिसते.
सदर कंपनीवर कार्यवाही होण्यासाठी RPS इंटरनॅशनल प्रेसचे पारनेर तालुका अध्यक्ष रांजेंद्र चितळकर,व पारनेर तालुका माहीती सेवा समितीचे उपाध्यक्ष ,पत्रकार राजकुमार इकडे यांनी जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन देणार आहे असे सांगितले.