सातारा:-साताऱ्यात उदयनराजे फिक्स.. पण महिन्याभर का प्रतीक्षा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात उदयनराजे फिक्स.. पण महिन्याभर का प्रतीक्षा…
सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये २४ उमेदवारांचे ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते .त्यामध्ये तीन अर्ज अवैध ठरलेले आहेत. आता २१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक असून नेमके किती जण माघारी घेतात ? हे लवकरच स्पष्ट होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापर्यंत म्हणजे २२ एप्रिल पर्यंत आहे त्याकडे आता लक्ष लागले आहे.
गेली महिनाभर भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यासाठी विलंब लावला पण हा विलंब म्हणजे राजकीय खेळी होती. हे आता सिद्ध झालेले आहे. वास्तविक पाहता एक महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडतील. या आशेवर महाविकास आघाडी वेट अँड वॉच करत होती. पण भाजपने श्री छ खा उदयनराजे भोसले यांना फिक्स केलं पण ते जाहीर केले नाही. महाविकास आघाडीला त्याचा अंदाज लागू दिला नाही. या पाठीमागे राजकीय डावपेच म्हणावे लागतील. विरोधकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी गुगली टाकली. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील महायुतीचे नेते अनेक वावड्या उठवत होते. महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. असा आभास निर्माण करून महाविकास आघाडीमधील अधिकृत ठरणारे उमेदवार खा .श्रीनिवास पाटील यांच्या विरोधातच राष्ट्रवादी मधूनच सुरुंग लावण्यासाठी चांगली वात पेटवली गेली. खा. श्रीनिवास पाटील यांचा वयाचा विचार करून ते निवडणूक लढवणार नाहीत. असे त्यांनी स्वतः सांगितले नाही पण, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनीच ही माहिती देऊन खा. श्रीनिवास पाटील यांना शांत बसायला भाग पाडले. तर दुसऱ्या बाजूला सत्यजित पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सुनील माने व आ .शशिकांत शिंदे अशी नावे इच्छुक उमेदवारांच्या यादीत टाकून आमच्याकडे इच्छुक भरपूर आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण अंदर की बात अशी होती की, श्री छ खा. उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणून त्यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला गेला होता. त्याला श्री. छ. खा. उदयनराजे भोसले तयार नसल्यामुळे अखेर राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली. महाविकास आघाडी मधील राष्ट्रीय काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे तगडे उमेदवार होते. त्यांना काँग्रेसच्या हाताच्या पंजावर निवडून येण्यास मदत झाली असती पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःच्या तुतारीची काळजी होती. या काळजीपोटी अखेर आ. शशिकांत शिंदे यांच्या हातात तुतारी फुकण्यास दिले आहे. हे आता उघड झाले आहे.
सातारा लोक लोकसभा मतदार संघातून भाजपने श्री छ खा उदयनराजे भोसले यांची उमेदवारी कधी जाहीर करणार ? याची चांगलीच उत्सुकता ताणून धरली होती आणि त्या अर्थाने मतदारांनी सुद्धा श्री छ खा उदयनराजे भोसले हेच भाजपचे अर्थात महायुतीचे उमेदवार असतील. असे गृहीत धरले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ? हा प्रश्न उरला नव्हता तर भाजपचे कमळ आणि उदयनराजे भोसले हे समीकरण जुळले होते.
महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बेबनाव नसल्याने महायुती प्रचारामध्ये उतरली होती. तर दुसऱ्या बाजूला श्री.छ. खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने माझ्याकडे विमान, रेल्वे, बस आणि सिनेमागृहाची तिकीट आहे. असे सांगून सर्व पर्याय मला खुले असल्याचे दाखवून दिले होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पर्याय नव्हता. अखेर श्री.छ. खा. उदयनराजे भोसले हे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येणार नाहीत. याची जाणीव झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर बाय देण्यापेक्षा आ. शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी करून औपचारिकता पूर्ण केली. असा आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत .
सातारा लोकसभेसाठी सामान्य मतदारांना अपेक्षित असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नव्हते तर काँग्रेसकडे पर्याय उमेदवार असूनही त्यांनी हाताच्या पंजावर लढू नये तर हातात तुतारी घ्यावी. असा आग्रह धरला होता. यातूनच राष्ट्रीय काँग्रेसने आम्ही घेणार हाताचा पंजा.. फुका तुमची तुम्ही हाताने.. असा संदेश देण्यात राष्ट्रीय काँग्रेस यशस्वी ठरली. तर शिवसेनेने साधा दावा सुद्धा केला नाही.
आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. वास्तविक पाहता ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांना सातारा जिल्ह्याने दाखवलेला विश्वास पर्याय म्हणून स्वीकारला होता. दोन वेळाश्री छ. खा. उदयनराजे भोसले व खा. श्रीनिवास पाटील, खा लक्ष्मणराव पाटील यांना निवडून दिले होते. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. राष्ट्रवादीचा सातारा जिल्ह्यातील राजकीय बालेकिल्ला हा आता वयोवृद्ध झालेला आहे. हे सांगण्याचे धाडस फक्त अजितदादा पवार यांनी केले. ज्येष्ठ नेते रामराजे नाईक- निंबाळकर ,आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांनीसुद्धा तीच री ओढली आहे.
अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा दुसऱ्या फळी साठी जागा करून देत असताना अजितदादा सारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिलर महाविकास आघाडी का सोडून गेले ? याचे आत्मचिंतन करा. असे सातारा जिल्ह्यातील मतदार विचारू लागले आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने श्री. छ . खा भोसले यांना उमेदवारी जाहीर करून कॅडर बेस्ट बांधणी असलेल्या भाजपच्या सर्व यंत्रणा चांगलेच कामाला लावली आहे. त्यातून निकाल स्पष्ट होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यापूर्वी देशाचे कृषिमंत्री म्हणून सलग दहा वर्ष कार्यरत राहणाऱ्या श्री पवार साहेबांनी नेमकं सातारासाठी काय केले ? हे आता लोक विचारू लागलेले आहेत. ज्यांच्याकडे आता घड्याळ राहिलेले नाही. त्यांची आता तुतारी किती वाजेल ? हे आता सांगणे सोपे झालेले आहेत. कारण, तुतारी फुंकण्यासाठी जे हाताचे बळ लागते. श्वास लागतो. तो आता राहिलेला नाही. त्यामानाने कमळ टवटवीत ठेवण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यामुळे महिन्याभरच्या प्रतीक्षेनंतर भाजपने केलेली खेळी यशस्वी ठरलेली आहे. हे आता जाणवू लागलेले आहे.