ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-मेरा देश,, मेरी मिट्टी सोबतच मेरा भाई,, मेरा अपना साताऱ्यात दर्शन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मेरा देश,, मेरी मिट्टी सोबतच मेरा भाई,, मेरा अपना साताऱ्यात दर्शन.
सातारा दि: आपला भारत देश हा एक संघ व अखंड होता. सर्वधर्मसमभाव व बंधुभाव जोपासला जात असतानाच राजकारणाच्या माध्यमातून जातीयवाद उफाळला आहे. त्यामुळेच भारत जोडो व मेरा देश मेरी मिट्टी असे उपक्रम राबवण्याची राजकीय पक्षांवर वेळ आली आहे .परंतु खऱ्या अर्थाने साताऱ्यात मेरा भाई मेरा अपना हाच संदेश छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भेटीने दिसून आला. या अल्हाददायक क्षणामुळे खऱ्या अर्थाने मेरा देश,, मेरी मिट्टी या भाजपच्या उपक्रमाला यश मिळाल्याचे समजण्यात येत आहे.
सध्या आपल्या भारत देशामध्ये भारत विरुद्ध इंडिया असे चित्र निर्माण झाले आहे. पूर्वी क्रिकेट सामने पाहताना पाकिस्तान विरुद्ध इंडिया, श्रीलंका विरुद्ध भारत, वेस्टइंडीज विरुद्ध भारत, इंग्लंड विरुद्ध इंडिया असे मानले जात होते. आता राजकीय दृष्ट्या इंडिया या शब्दामुळे विरोधकांनी इंडिया शब्दाला मोठी उंची प्राप्त करून दिल्यामुळे भयभीत झालेल्या भाजपने आता भारत हाच नारा देण्यास सुरुवात केलेली आहे. तो आता देशा अभिमानापेक्षा चेष्टेचा विषय होत आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे घटक पक्ष अनेक आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे .पण आता मोदी भक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ भारत असे नामकरण करतील का ? असा आता विरोधक प्रश्न विचारू लागलेले आहेत. मुळातच संविधानामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडिया व अनेक इंडिया शब्दातून केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत. उपक्रम आहेत. त्यामुळे आता शाब्दिक राजकारण करण्यापेक्षा मनातून स्वच्छ व सुंदर प्रतिमा तयार करून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणे गरजेचे आहे. याचीच प्रचिती सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाहण्यास मिळाली.
सातारा शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या जागेला शिवतीर्थ म्हटले जाते याच ठिकाणी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज घराण्यातील दोन बंधूंची भेट ही आता ऐतिहासिक ठरलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऐतिहासिक किल्ला प्रतापगड या ठिकाणी मेरा देश,, मेरी मिट्टी हा उपक्रम राबवून प्रतापगडावरील माती एका कलशात जमा करून हा कलश मुंबई मार्गे दिल्लीला पाठवण्याचे नियोजन होते. परंतु, अचानक पाऊस कोसळल्यामुळे प्रतापगड वर जाण्याचा बेत रद्द करण्यात आला.
त्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करून सातारा शहरातील नाका या ठिकाणी शिवतीर्थावर हा कार्यक्रम घेण्यात आला .या वेळेला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची इंट्री झाली. अगदी राजघराण्यातील परंपरेनुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे समोर येताच त्यांना नमस्कार केला. त्याला प्रतिसाद देताना चक्क उदयनराजे यांनी मुजरा घातला. या मुजरामुळे खऱ्या अर्थाने अनेकांचे डोळे पाणावले. दोन्ही बंधूंनी एकमेकांना अलिंगन देत हास्यविनोदाने संवाद साधला. खरोखरच मेरा भाई, मेरा आपना हाच खरा उपक्रम मानवतेला स्पर्श करून गेला. राजकारणात मतभेद असू शकतात. वैचारिक दोन मार्ग असतात. परंतु रक्ताची नाती ही अधिक महत्त्वाची असते. हीच शिकवण दोन्ही राज्यांनी दिली आहे.
या आनंदाच्या सोहळ्याच्या वेळेला जेष्ठ नेते शंकर माळवदे, विकास गोसावी, भरत पाटील, सुनील काटकर, आ .जयकुमार गोरे, डॉ अतुल भोसले, सुहास राजेशिर्के,मनोज घोरपडे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना हा आनंदाचा सोहळा पाहताना भाऊबंदकी पेक्षा भाऊ बंधन दिसले . यापुढे आता मेरा देश, मेरी मिट्टीपेक्षा सर्वांनी त्याचा आदर्श घेऊन मेरा भाई, मेरा अपना हा उपक्रम घरोघरी राबवावा असे सुचित करावे वाटत आहे. अशी चांगली प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
———————————————
फोटो