ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-(भुईंज)-!! … मोती साबणाने आंघोळीची वेळ आली.!!

पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

RPS STAR NEWS

!! … मोती साबणाने आंघोळीची वेळ आली.!!

!! … मोती साबणाने आंघोळीची वेळ आली.!! ज्यांचे वय २५-३० च्या पुढे आहे त्या मंडळींना दीपावलीत आवर्जून वापरल्या जाणाऱ्या मोती साबणाचे महत्त्व त्याची क्रेझ चांगलीच माहित आहे, मोती साबणाने स्नान म्हणजे एक पर्वणीच जणू. महाराष्ट्रात बहुचर्चित अशा येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले म्हणायला हरकत नाही १५ ऑक्टोबर ही मतदानाची तारीख जाहीर झाल्याचे समजते, येणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची तसेच उत्कंठापूर्वक असणार, पैशाचा महापूर येणार हे वेगळे सांगायला नको, एक प्रकारे धनदांडग्यांची दंगल उसळणार, पैसा हाच निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणार असे एकंदरीत चित्र आहे. प्रचंड पैसा ओतणे हे निवडून येण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे हे भारतीय लोकशाहीतील प्रसारमाध्यमांनी तसेच जनतेनेही जणू मान्यच केलेले दिसतं तसं सध्याचं वातावरण आहे. चालूघडीला महाराष्ट्रात राजकीय रणनीतीकारांचं पेव फुटलयं,निवडणुकीसाठी रणनीती आखणाऱ्या कंपन्यांचा भाव १०० कोटींपासून पुढे आहे अशा बातम्या ऐकायला मिळतात. रणनीतिकार व विविध माध्यमांच्या सर्वेवर इतका प्रचंड पैसा ओतला जातोय याचा अर्थ याच गोष्टी निवडणूका जिंकून देतात असा राजकारण्यांचा समज झालाय त्यामुळे जनमाणसाला, लोकांना ते गृहीत धरूनच निवडणुकांचे आडाखे बांधतात. या निवडणूक प्रक्रियेत राबणारे रणनीतिकार, डावे उजवे कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे सोशल मीडियावरचे विश्लेषक, जाहिरात माध्यमे यांचा सुकाळ येणार, त्यांची चकांदळ होणार एका अर्थाने ही मंडळी मोती साबणाच्या अभ्यंगस्नानाची अनुभूती घेणार हे मात्र खरं आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप होणार, खरं खोटं कोणाचंतरी बिंग फुटणार अशा एक ना अनेक गोष्टी. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते श्री श्याम माधव यांनी एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडलेलं आहे त्या अनुषंगाने राज्याचे आजी-माजी गृहमंत्री समोरासमोर आलेत, एकमेकांच्या वस्त्रहरणाची भाषा करू लागले,ज्या पेनड्राईव्हमध्ये गुपित दडलेलं आहे त्याचंही दर्शन माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी मीडियाद्वारे दिलं त्यावर प्रतिक्रिया देताना श्री देवेंद्र फडणवीस यांनीही देशमुखांच्या संभाषण टेपची वाच्यता सार्वजनिक करण्याची धमकी दिली. दोघेही राज्यातले जबाबदार नेते आहेत त्यांनी एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणजे जनतेलाही कळेल नक्की राज्याच्या राजकारणात काय चाललंय? आज अखेर देशात ८००० पेक्षा जास्त राजकीय नेते, कार्यकर्ते, अधिकारी खोट्या केसेस मध्ये जेरबंद आहेत असा तज्ञांचा दावा आहे ही एकप्रकारची अघोषित आणीबाणीच आहे. जनता हा तमाशा निमूटपणे बघण्याशिवाय काहीही करू शकत नाही, एकदा मतदान झाले की पुढच्या गोष्टी सामान्यांच्या हाताबाहेर जातात ही परिस्थिती बदलण्याची ताकद जनतेच्या एका मतात आहे, ज्याचं मोल होवू शकत नाही असा मतदानाचा अधिकार राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे त्याचा सजगपणे, हुशारीने, विवेक शाबूत ठेवून वापर केला तर काही प्रमाणात का होईना बदल निश्चित घडेल. तात्पुरत्या मदतीला, खोट्या आश्वासनांना बळी न पडण्याचं आव्हान जनतेसमोर आहे, भ्रष्टाचाराचे, अनागोंदीचे, मनमानी कारभाराचे सरगणा, सेनापती नक्की कोण आहेत याचा विचार जनतेला करावा लागेल.
आजमितिला आमदाराचं स्थान म्हणजे संस्थानिकांपेक्षा कमी नाही, मतदारसंघातील सर्व ताकद एका ठिकाणी एकवटलेली असते. सर्वसाधारण ३ ते ३.५ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आमदाराला मिळते. राज्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी कायदेमंडळात त्यांना स्थान मिळते, त्यांच्या सहमतीने कायदे बनवले जातात इतक्या लोकांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती निश्चितच चारित्र्यसंपन्न, विचारी, लोकहितवादी,विकासाची दृष्टी,सुशिक्षित असणं गरजेचं आहे तसे लोकशाहीचे संकेत आहेत परंतु अलीकडच्या मायावी राजकारणात ह्या सर्व गोष्टी लुप्त झाल्या आहेत. पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा हा एकच मूलमंत्र रूढ झाला आहे, दुर्दैवाने समाजातील सर्व घटकांची याला मान्यता दिसते. राज्यात विधानसभेला उमेदवारी करण्यायोग्य सुशिक्षित,विचारी,धाडसी तरुणांची कमी नाही परंतु राजकीय पक्षांनी निवडणुकीत पैशाचं असंकाही अवडंबर करून ठेवलयं की समाजकारणाशी नाळ जोडलेले, सामान्यांची कणव असणारे तरुण या निवडणूक प्रक्रियेपासून कोसो दूर आहेत, तशा प्रकारचं नॅरेटीव्ह प्रस्थापितांनी तयार करून ठेवलं आहे. ऐकास ऐक उमेदवारांमध्येच लढत लावण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न असतो, दोन्ही उमेदवार लायक नाहीत त्यांना जनतेची पसंती नाही परंतु अन्य पर्यायी उमेदवारच नसल्याने मतदार हतबल असतात, इच्छा असूनही मतदार काही करू शकत नाही. तेंव्हा जनतेसमोर सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे हे राज्यातील सुशिक्षित तरुणांचं आद्यकर्तव्य आहे त्यांनी धाडसाने या निवडणूकप्रक्रियेत सहभाग नोंदवणं गरजेचे आहे तरच लोकशाहीला अभिप्रेत असणारे उमेदवार आपण विधानसभेत पाठवू शकू अन्यथा सालाबाद प्रमाणे “गणा धाव रे मला पाव रे” म्हणण्याची वेळ जनताजनार्दनावर येईल हे मात्र नक्की.
✍🏻 श्री कल्याण पिसळ देशमुख, ओझर्डे.
सरचिटणीस-सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी.
फोन ९८५०४१२९०९.
Mallikarjun Kharge
Indian National Congress
Rahul Gandhi
Sharad Pawar
Indian National Congress – Maharashtra
Nana Patole
Prithviraj Chavan
Jayant Patil – जयंत पाटील
Maharashtra Pradesh Congress Committee
Dr. Suresh जाधव

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button