पुणे:-गिरवी तालुका फलटणचे श्री.अनिल कदम यांचा गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मानित.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
गिरवी तालुका फलटणचे श्री.अनिल कदम यांचा गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मानित.
पुणे- गिरवी ता. फलटण येथील श्री.अनिलकुमार कदम यांना शैक्षणिक, सामाजिक ,कृषी क्षेत्रातील अध्यापन , प्रशासन,संशोधन, प्रशिक्षण, लेखन या उत्कृष्ट उल्लेखनीय अतुलनीय कामगिरी बद्दल व उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, वरिष्ठ मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख या विविध पदावर विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी दिलेल्या मोलाचे योगदानाबद्दल उपक्रमशील, प्रयोगशील,शिक्षण तज्ञ अनिलकुमार कदम यांचा पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात “गगनभरारी समर्थ सन्मान सन २०२५” या पुरस्काराने उद्योजक श्री.दीपक मोकाशी यांचे शुभहस्ते शाल, पुष्प गुच्छ,सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरस्कार स्वीकारताना मराठी मासिक दमयंतीच्या संपादिका सौ. कल्पना कदम,बाल साहित्यिक जिज्ञासा कदम उपस्थित होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे बुक फेअरचे संस्थापक अध्यक्ष राजेश पांडे होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे पत्रकार विद्याधर ताठे, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कुलकर्णी उपस्थित होते.
या प्रसंगी अनिलकुमार कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कार्याची माहिती देणारे लेखन असलेले गगनभरारी पुस्तक प्रकाशन प्रकाशन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले.
यावेळी पत्रकार विद्याधर ताठे, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कुलकर्णी, राजेश पांडे यांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.
प्रास्ताविक व्यंकटेश कल्याणकर यांनी केले.सुनील धनगर व प्रज्ञा कल्याणकर यांनी सुत्रसंचलन केले.मानसी चिटणीस यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी समर्थ फौंडेशनचे किरण इनामदार,वल्लरी मिडिया चे व्यंकटेश कल्याणकर, ज्योती इनामदार, श्रध्दा जगदाळे, गणेश चप्पलवार , जगन्नाथ कुलकर्णी यांनी आयोजन व नियोजन केले.