सातारा:-साताऱ्यात मंत्र्यांच्या बंगल्यासमोर रक्तदान आंदोलनाने पोलीस छावणीचे स्वरूप…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
साताऱ्यात मंत्र्यांच्या बंगल्यासमोर रक्तदान आंदोलनाने पोलीस छावणीचे स्वरूप…
सातारा दि: लोकशाहीमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणे क्रमप्राप्त आहे. दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या प्रहार संघटना आणि प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या आंदोलकांचे प्रश्न प्राधान्य सोडवण्याची भूमिका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली आहे. परंतु, दिव्यांग बांधवांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे माजी मंत्री व प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या सुरुची बंगल्यासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पण ,अतिरिक्त पोलीस बंदोबस्तामुळे त्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले .
वास्तविक पाहता शरीराने दिव्यांग असलेल्या बांधवांना आक्रमकरीत्या काही करता येत नाही. कारण, नैसर्गिक रित्या त्यांना हालचाल करताना खूपच अडचण होते. अशावेळी त्यांनी रक्तदान या सामाजिक उपक्रम राबवून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या कायदेशीर रित्या घटनात्मक अधिकार त्यांना मिळवून द्यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयासमोरील उपोषण स्थळी जाऊन दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत भूमिका स्पष्ट केली. तरी आज प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांसाठी सुरुची बंगल्यासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
या रक्तदान शिबिराला सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उदंड प्रतिसाद देऊन रक्तदान केले. परंतु सायंकाळी पोलीस छावणीचे स्वरूप आल्यामुळे नेहमीप्रमाणे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या अनेक वाहन चालकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
दुसऱ्या बाजूला शाहूपुरी चौकामध्ये रस्त्यामध्येच एका धार्मिक संस्थेच्या कार्यक्रमामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. तर राजवाडा नजीक असलेल्या मंत्र्यांच्या सुरुची बंगल्या भोवती सुद्धा पोलीस ठाण्याचे स्वरूप आल्यामुळे भारत- पाकिस्तान बॉर्डरवर तणाव आहे का? असा मार्मिक प्रश्न एका ज्येष्ठ नागरिकांनी विचारला. या प्रश्नामागे व्यथा, संताप, चीड आणि अन्याय होत असल्याची भावना दिसून आली.
खरं म्हणजे साताऱ्यात अनेक आंदोलन होतात. पोलीस यंत्रणेतील काही कर्तव्यदक्ष पोलीस आंदोलन व संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणतात. त्यामुळे आंदोलकांनाही दोन पावले पुढे गेल्याचे समाधान लाभते. प्रहार संघटनेच्या आंदोलनाला शांतता व कायदा सुव्यवस्था पालन करून रक्तदान केले जात होते. या ठिकाणी खरं म्हणजे कोणीही अतिरेक करणार नव्हते तरी पोलीस बंदोबस्त पाहून नेमका काय प्रकार आहे ? हे कुणालाही समजत नव्हते. माजी मंत्री व प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आक्रमक भूमिका असून सुद्धा रक्तदानासारख्या विधायक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामुळे खऱ्या अर्थाने गरजवंत सातारकरांना रक्ताचा पुरवठा होत असताना सुद्धा पोलीस यंत्रणेने काही ठिकाणी बॅरिगेट टाकून रस्ते अडवून आंदोलकांना बाजूला करण्याचा जो प्रयत्न केला. त्याची मात्र उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सातारा शहरातील पोवई नाका येथील एका वजनदार मंत्र्याच्या बंगल्याच्या दारामध्ये आंदोलक बसल्यामुळे संबंधित मंत्र्यांच्या व पोलीस अधिकाऱ्यांच्या विचार विनिमयाने चार पोलिसांची बदली सातारा ते पाटण करण्यात आली होती. यामुळे खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल्याचे उपरोधात्मक संदेश दिला जात होता. त्याची पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. अशी चर्चा सुरू झाली.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
……………………………….