पवनानगर:-हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघाले पवनानगर- पवना शिक्षण संकुलाकडून दिंडी सोहळ्याचे आयोजन.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघाले पवनानगर-
पवना शिक्षण संकुलाकडून दिंडी सोहळ्याचे आयोजन.
रविवार (दिनांक २०) रोजी पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर व लायन शांत मानेक ज्युनियर कॉलेज , कै.मीराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित दिंडी सोहळ्यामुळे पवनानगरी हरिनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाली. संपूर्ण पवनानगरीला अलंकापुरी आळंदीचे स्वरूप आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रंग देखील लावल्या होत्या. दोन वर्षानंतर नेहमीप्रमाणे याही वर्षी कार्तिकी एकादशीच्या दिवशी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्व विद्यार्थी व शिक्षक वारकर्यांची वेशभूषा करून दिंडीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये विठोबा रखुमाई सह संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत सोपान महाराज यांच्या वेशभूषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी आठ वाजता सांप्रदायिक क्षेत्रातील आखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष शांताराम महाराज बोडके, इको व्हिलेज गोधाम चे संस्थापक नितीन घोटकुले, माजी सभापती निकिता घोटकुले, सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच अमित कुंभार, प्राचार्य अंजली दौंडे, यांच्या हस्ते विनापूजन प्रतिमा पूजन, ग्रंथ पूजन करून दिंडी सोहळ्याचे प्रमुख गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, संजय हुलावळे भारत काळे भारत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी शाळेतून निघाल्यानंतर पवनानगर चौक येथे एक विश्रांती घेऊन काले गावातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या दिंडी मध्ये लेझीम पथकाबरोबरच वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी, पर्यावरण दिंडी, यांनी सहभाग घेतला होता या पथकांनी प्रत्येक चौकात प्रात्याक्षिके दाखवून नागरिकांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला. ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप देखील करण्यात आले अनेक ठिकाणी ग्रामस्थ व शिक्षक यांनी सांप्रदायिक खेळ, फुगडी, खेळत दिंडीत सहभाग घेतला होता त्यामुळे त्यामुळे संपूर्ण पवनानगर नगरी हरिनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले. जणू काही अलंकापुरी आळंदीच अवतरल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.