सातारा:-साताऱ्यातील प्रामाणिक अधिकाऱ्यांचे केले वंचित ने मनापासून स्वागत.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यातील प्रामाणिक अधिकाऱ्यांचे केले वंचित ने मनापासून स्वागत.
सातारा दि: सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शासकीय कार्यालय आहेत. अनेक अधिकारी व कर्मचारी वर्गाने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. परंतु, साताऱ्यात प्रथमच आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारे सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी चक्क सामान्य माणसासाठी फलक लिहून आपल्या कार्याची चुणूक दाखवली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी आज प्रामाणिक अधिकाऱ्याचे कौतुक करून मनापासून स्वागत केले .
प्रशासकीय कामकाज करत असताना ग्रामीण भागातील लोकांचा कळत नकळत सातारा पंचायत समितीशी संपर्क व संबंध येतो. अशा वेळेला घरकुला पासून ते घर , रस्ता, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती , शाळेच्या खोल्या व इतर विकास कामांबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क येतो.
कधीकधी शासकीय कामानिमित्त गटविकास अधिकाऱ्यांना सातारा तालुक्यातील अनेक भागांमध्ये दौरे करावे लागतात. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. अशा वेळेला ते कार्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला संपर्क नंबर व आपल्या निवेदन व तक्रारी व्हाट्सअप नंबर वर पाठवून लोकांची कामे गतीने व्हावी. यासाठी फलक लावलेला आहे .लोकांच्या मध्ये एक चांगला संदेश जावा. पारदर्शक कारभार व्हावा. याच भावनेतून त्यांनी ही अभिनव संकल्पना राबवलेली आहे.
सदर गोष्टीची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांना सातारा पंचायत समितीमध्ये जाऊन प्रामाणिक अधिकाऱ्याचे स्वागत व कौतुक केलेले आहे. आपल्या कार्यपद्धतीमुळे वंचित समाजाला न्याय मिळण्याची अशा पल्लवी झाल्याचे जिल्हाध्यक्ष श्री देसाई यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत सुधाकर काकडे, मिलिंद कांबळे, पत्रकार अजित जगताप, अमोल गंगावणे उपस्थित होते.
—————————————————–
छाया गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांचे स्वागत करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व पत्रकार अजित जगताप (छाया – गुरुदास जाधव,सातारा)