श्रीरामपूर:-23 वर्षाची रविना शिंदे झाली उक्कलगावची सरपंच.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
23 वर्षाची रविना शिंदे झाली उक्कलगावची सरपंच.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) दिनांक ०५ नोहेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रात जवळजवळ साडेतीन ते पावणे चार हजार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली असून सहा तारखेला सरपंचपद तसेच ग्रामपंचायत मेंबर्स यांचा निकाल लागला असुन जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने दावे करतो आहे की ‘ आमच्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा आले आहेत . खरं काय खोटं माहीत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये एक आतशय चुरशीची आणि निर्णय निवडणुक होऊन सर्व महाराष्ट्राचे लक्ष त्या ग्रामपंचायतने वेधुन घेतले आहे . त्याला कारणही तसेच आहे कारण त्या ग्रामपंचाचायत
निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वयाची मुलगी ही सरपंच पदासाठी उभे होती आणि ती सुद्धा एक चांगल्या धुरंधर राजकीय नेत्याच्या पॅनलच्या विरोधात ते ठिकाण आहे श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव उक्कलगाव हे आतिशय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव समजले जाते त्यात सरळ – सरळ लढत हरिहर एकता आघाडी विरुद्ध समाजसेवा मंडळ उक्कलगाव अशी झाली होती . त्यात समाजसेवा मंडळाचे नेतृत्व श्री इंद्रनाथ पाटील थोरात तर हरिहर विकास मंडळाचे नेतृत्व श्री आबासाहेब थोरात हे करत होते . त्या निवडणुकीत कुमारी रवीना तुळशीराम शिंदे . ही २३ वर्षे वयाची मुलगी निवडुन येऊन गावची कारभारीन म्हणजेच प्रथम नागरिक सरपंच झाली आहे . ती मुलगी स्वत : सुशिक्षित असुन एम कॉम उच्चशिक्षित
आहे तिचे वय आतिशय अल्प असुन ती सरपंच झाली आहे . गावच्या सुज्ञ ग्रामस्थांनी अतिशय तरुण व अल्पवयीन मुलीच्या हातात कारभार दिला असुन भविष्यात ती गावाचा कारभार कशा पद्धतीने चालवते याकडे गावाचे लक्ष निक्षितच लागलेले आहे.
जास्तीत जास्त तरुण तरुणीच्या हातामध्ये देश निश्चितच घावा असं निवडून आलेल्या सरपंच कुमारी रवीना शिंदे यांचे म्हणणं आहे . रवीना शिंदे या आतिशय गरिबी परिस्थितीतुन असुन गावच्या ग्रामस्थांनी भरभरून मत देऊन पुर्ण प्रेम देऊन गावाने त्यांना निवहुन आणून गावचे कारभारीन केले आहे तरी बघूया भविष्यात या गावची कारभारीन उच्चशिक्षित व राजकारणात सर्वात कमी वयाची मुलगी ही कशा पद्धतीने गावाच्या कारभार करते आहे याकडे संपुर्ण जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे.