कोरेगावात दुबारा पेरणीच्या धर्तीवर दस्त्याची नोंदणीबाबत २६ जानेवारी रोजी आंदोलन – श्री रमेश उबाळे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )
कोरेगावात दुबारा पेरणीच्या धर्तीवर दस्त्याची नोंदणीबाबत २६ जानेवारी रोजी आंदोलन – श्री रमेश उबाळे.
कोरेगाव दि: राजमा पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरेगावात दुबारा पेरणीच्या धर्तीवर एकच दस्त दोन वेळा नोंदणी करण्याचा प्रकार घडलेला आहे. याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी व अन्यग्रस्त दलित समाजातील खंडाईत कुटुंबीयांनी प्रजासत्ताक दिन दि: २६ जानेवारी रोजी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
याबाबत माहिती अशी की,
मौजे शिरढोण तालुका- कोरेगाव ,जिल्हा -सातारा येथील खंडाईत कुटुंबातील सदस्यांच्या जमिनीबाबत १९८५ पासून प्रलंबित दिवाणी न्यायालयाचा जमिनीचा वाद आहे .न्यायप्रविष्ठ जमिनीच्या बेकायदेशीर दस्ताची खरेदी विक्री करून अधिकाऱ्यांनी मलिदा लाटलेला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दस्त नोंदणी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. बेकायदेशीर दस्त करणाऱ्या व्यक्ती व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा. अन्यथा दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी कोरेगाव उप विभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयाबाहेर खंडाईत कुटुंब आमरण उपोषण करणार आहेत .
-शिरढोण ,तालुका- कोरेगाव येथील दलित कुटुंब कायम रहिवासी असून त्यांच्या घरातील जमिनीचे वाटप झालेले नाही .तरीदेखील जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार झाला आहे . पाऊस पडला नाही तर लागवड केलेली रोपटे करपून जाते. त्यामुळे दुबारा पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर असते. शेतजमिनी बाबतही आता दुबारा नोंदणी करण्याचा प्रकार घडल्यामुळे सामान्य दलित कुटुंबाची फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे. दलित कुटुंबानं वारंवार भेटून अर्ज देऊन देखील ,सातबारा वर त्यांची नाव चढवली. त्या कुटुंबांना विचारात न घेता आर्थिक देवाण-घेवाण झाले आहे. या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे ,तरी शिरढोण सजातील गाव कामगार तलाठी , मंडल अधिकारी , दुय्यम निबंधक, तहसीलदार यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे.असे निवेदनात नमूद केलेले आहे .
शिरढोण गावातील
गट नंबर ३९६, ४१२,४५१,४५४४५९,८७४ ८७८ या जमिनीचे कब्जे वहिवाट संपूर्ण या दलित कुटुंबाकडे आहे. ज्या व्यक्तीने दस्त बेकायदेशीर रित्या केलेले आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा . दलित कुटुंबांना संरक्षण द्यावे .त्यांच्या शेतावर वारंवार गुंड लोक पाठवले जात आहेत. त्यांना धमकवण्याचाही काम चालू आहे .या दलित कुटुंबाचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार दस्त करणारी व्यक्ती व शासकीय अधिकारी असतील. असाही इशारा देण्यात आलेला असून या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नोंदणी आयुक्त, सातारा जिल्हाधिकरी ,सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधितांना पाठवण्यात आलेले आहेत. अशी माहिती उपोषणाची तयारी करणारे खंडाईत कुटुंबीयांनी दिलेली आहे.