सातारा:-साताऱ्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गुरुजींचे आंदोलनाचा श्री गणेशा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गुरुजींचे आंदोलनाचा श्री गणेशा.
सातारा दि: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते पिईल . तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. आज शिक्षक समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात गुरुजनांना आपल्या मागण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा श्री गणेशा करून शासनाला निवेदन दिले .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या मान्यता प्राप्त शिक्षक संघटनेने शाळेच्या पहिल्याच दिवशी १५ जून रोजी दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या द्वारे राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेले आहे. त्याच्याच भाग म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केले. शनिवारी हा शाळेचा अर्धा दिवस असल्यामुळे काही शिक्षक उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, समितीचे राज्य शिक्षक नेते उदय शिंदे ,जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे, प्रदीप कदम, शंकरराव देवरे, गजानन वारागडे ,श्रीकांत दोरगे, आबासाहेब जाधव, अनिल पिसाळ, नवनाथ जाधव, मोहन सातपुते, बाळकृष्ण कुंभार, अजित हिंगे, एम.डी. दडस ,अनिल डोईफोडे, उमेश पाटील यांच्यासह प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन किरण यादव व संचालक या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य शासनाने संच मान्यता आणि शिक्षक निर्धारण संबंधाने प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पद व्यापक करून सेवानिवृत्त शिक्षकांना कमी पटाच्या शाळेत मानधनावर शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे .इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी आणि मुख्याध्यापक पदाचे नवे निर्धारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनात निर्माण करणार आहे. शिक्षकांच्या गणवेश संहितेचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचबरोबर भारत साक्षरता कार्यक्रमासाठी १५ ते ३५ वयोगटातील प्रौढ सर्वेक्षण करणे. शिकवणे आणि परीक्षा घेणे. अनेक अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांवर लादल्यामुळे तसेच शिक्षकांना मोबाईल द्वारे प्रशासनाची माहिती विचारून त्यांचे अध्यापनापासून लक्ष विचलित केले जात आहे.
त्यामुळे शिक्षकांच्या खाजगी आयुष्याला अस्वस्थता निर्माण झालेले आहे. या सर्व मागण्यांचा पुनर्विचार करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी दिनांक १५ जून रोजी संपूर्ण राज्यात विदर्भासह धरणे, निदर्शना आंदोलन करण्यात आलेले आहे.
या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग सहभागी झाले आहेत. शनिवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे या आंदोलनाच्या आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. तरीही शिक्षकांची भूमिका शिक्षक नेत्यांनी मांडली. या वेळेला शिक्षिका सौ रत्नमाला मोहिते, संतोष घोडके, विठ्ठल फडतरे, तातोबा भिसे यांनी शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपस्थित पत्रकारांना माहिती दिली. या आंदोलनामुळे शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आता पालकांनीही त्यात सहभागी होणे गरजेचे आहे. अन्यथा फक्त शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाही .असेही काही पालकांनी स्पष्ट सांगितले.
———————————————–
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करताना शिक्षक