सातारा:-वाई – जनतेच्या मनातला मंत्री : मकरंद पाटील.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
जनतेच्या मनातला मंत्री : मकरंद पाटील.
पद नसल्यापासून आणि अनेक पदे आल्यानंतरही मकरंदआबांनी आपला साधेपणा आणि आपलेपणा नेहमीच जपला आहे. त्यांनी कधीही आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा रुबाब दाखवला नाही. ते दाखवणारही नाहीत. एकुणच त्यांच्या कार्यपध्दतीमुळे सर्वसामान्य जनतेला मनातला माणूस मंत्री झाल्याचा आनंद झाला आहे. सर्वसामान्य माणसाला हक्काचा मंत्री मिळाला आहे.
बोपेगावचे सुपुत्र राज्याचे मंत्री झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून कार्यकर्त्यांना आपणच मंत्री झाल्यासारखे वाटत आहे. नामदार मकरंद जाधव पाटील यांची कारकिर्द सर्वसामान्य जनतेच्या जीवनात क्रांती घडवणारी, वाई विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याचा कायापालट करणारी ठरेल, असा विश्वास राजकीय निरीक्षक व्यक्त करू लागलेले आहेत. वाई तालुक्यातील बोपेगाव सरपंचपदापासून दिवंगत राजकीय नेते लक्ष्मणराव पाटील तात्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. तशीच राजकीय कारकिर्द आबांनीही सुरु केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगदी तळापासून त्यांनी काम सुरु केल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची चांगली जाण त्यांना आहे. २००४ मध्ये पहिल्यांदा लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत आबांना पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. २००९ मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. सलग चारवेळा विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लांबीचा वाई — महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ सांभाळताना सर्वसामान्य जनतेशी कायम जनसंपर्क ठेवण्याची हातोटी आबांनी कष्टाने आत्मसात केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या दारात जाउन, त्यांचे प्रश्न सोडववण्याचे काम गेली वीस वर्षे आबा अव्यहातपणे करत आहेत. अतिवृष्टीचा महाबळेश्वर आणि दुष्काळी खंडाळा अशी त्यांची वाटचाल राहिली आहे. तिन्ही मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न सोडवताना त्यांना नेहमीच तारेवरची कसरत केली आहे. मात्र तरीही विकासाचे प्रश्न सोडवताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही.
विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर त्यांनी मतदारसंघात केली आहेत. प्रचंड जनसंपर्क आणि विकासकामांचा डोंगर या बळावर त्यांनी सामान्य माणसांची हृदये जिंकली आहेत.
आबांनी फक्त मुलभूत विकासाची कामे केली नाहीत तर सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेले सर्वच मुलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीवर त्यांचा भर राहिला आहे. तीन साखर कारखाने अडचणीत आले होते, शेतकऱ्यांचा उसाला भाव मिळत नव्हता. सहकारी साखर कारखाने खाजगीकरणाच्या वाट्यावर होते. आपल्या हक्काचे साखर कारखाने असतानाही उस तोडून नेण्यासाठी मतदारसंघातील शेतकऱ्यांना इतर कारखान्यांकडे गयावया करावी लागत होती. ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी एक हजार कोटीच्या कर्जाचा बोजा त्यांनी स्वत:च्या डोक्यावर घेतला. तीन कारखाने वाचवण्यासाठी त्यांनी राजकीय टोकाची भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्यावेळी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीच आबांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दादांनी सांगितले होते. मात्र आबाने त्यावेळी मंत्रिपदासाठीही दादांची साथ दिली नाही. मंत्रिपदाचाही त्याग केला. मात्र त्यानंतर जनतेच्या आग्रहास्तव आणि दोन कारखाने वाचवण्यासाठी त्यांनी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयही अचूक ठरला. दोन्ही साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या शिफारशीने कर्जाची पुर्नरचना करण्यासाठी मोठे पॅकेज मिळाले. किसनवीर आणि खंडाळा असे दोन्ही सहकारी साखर कारखाने वाचवण्यात आबांना यश आले. साखर कारखान्यांसाठी आपले आयुष्य आणि राजकीय कारकिर्द पणाला लावणारा असा नेता महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही. साखर कारखाने म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील खरी अर्थवाहिनी आहे. ही अर्थवाहिनी टिकवण्यासाठी आबांनी केलेला त्याग वाई आणि खंडाळ्याची जनता कधीही विसरु शकत नाही. त्यामुळेच प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आबांचे मताधिक्क्य वाढतच गेलेले आहे. हे मताधिक्क्य कधीच घटले नाही आणि भविष्यातही घटणार नाही, अशा प्रकारची कामगिरी आबांनी करुन दाखवली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात पुनर्वसन व मदत हे दमदार आणि वजनदार खात्याची जबाबदारी अजितदादांनी आबांवर सोपवली आहे.
सातारा जिल्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमय करण्यासाठी पक्षाने आबांना ताकद देण्याचे ठरवले आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून आबांनीही मतदारसंघाचा आणि संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी भूमिका घेण्याचे ठरवले आहे. महायुतीतील इतर मंत्र्यांच्या सोबतीने जिल्हा विकासाच्या वाटेवर घेवून जायचा आणि जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष पूर्ण भरुन काढण्याचा मानस त्यांचा आहे.
वाई विधानसभा मतदारसंघाच्या वाट्याला ४५ वर्षानंतर कॅबिनेट मंत्रिपद आले आहे. मंत्रिपदाचा फायदा मतदारसंघाला होत असतो. मात्र इतका प्रदीर्घकाळ मतदारसंघ मंत्रिपदापासून दूर राहिल्याने मंत्रिपदाचा फायदाच कधी मतदारसंघाला दिसलेला नाही. मात्र आबांच्या रुपाने मंत्रिपदाचा उपयोग करुन आबांनीच विकासाचा झंझावात निर्माण केलेला जनतेला पहायला मिळणार आहे.
आदरणीय दिवंगत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या घराला लाल दिवा नवीन नाही. सलग अकरा वर्षे तात्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे सलग अकरा वर्षे त्यांच्या गाडीवर लाल दिवा होता. मात्र कधीही लाल दिव्याची मिझास त्यांनी केली नाही. कायम सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांची सुख दु:खे आपली माणूण त्यांनी काम केले. सर्वसामान्य जनतेला आपल्या हृदयाजवळ घेण्याचे काम तात्यांनी केले, तोच वारसा आबा पुढे चालवत आहेत. मकरंदआबा जरी आज मंत्री झाले असले तरी त्यांचे घर सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या मंत्रालयासारखेच होते. त्यांच्यात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कधीच अंतर राहिले नाही. मंत्रिपदे आल्यानंतर आपला रुबाब न दाखवता आहे, थेट सर्वसामान्य जनतेची कामे मंत्रालयातूनही होतील, हा विश्वास सर्वसामान्य जनतेला आहे. सर्वसामान्य जनतेचा मंत्री असाच कार्यकाळ यापुढील काळात मकरंदआबांचा पहायला मिळणार आहे. आज नाताळच्या शुभप्रसंगी मंत्री मकरंद पाटील यांची सातारा जिल्ह्यात दमदार एन्ट्री होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिरवळ पासून सुरुवात होणारआहे . सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येणार आहे. पाटील कुटुंबीयांच्या या कर्तबगारीने खरोखरच अनेक लोकांचे भले होणार आहे.
— हेमंत कदम, सातारा
—————————————-
चौकट—
राज्यसभेचे खासदार नितीन पाटील व राज्याचे मंत्री मकरंद आबा पाटील
ही राम लक्ष्मणाची जोडी सातारा जिल्ह्याचा लाभलेली आहे. दोन्ही बंधू हातात हात घालून जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करणारच, हा विश्वास आहे. रथाची ही दोन चाके अतिशय वेगाने मतदारसंघाच्या विकासासाठी धावतील आणि जनतेच्या मनातील मतदारसंघ घडवून दाखवतील, असा विश्वास जनतेच्या मनात आहे.