सिल्लोड:-लग्नानंतर नववधू दागिने घेऊन पसार; नातेवाइकांनी एजंटला दिला चोप -2.25 लाख रुपये केले वसूल.
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर
लग्नानंतर नववधू दागिने घेऊन पसार; नातेवाइकांनी एजंटला दिला चोप -2.25 लाख रुपये केले वसूल.
लग्न झाल्यानंतर दागिने घेऊन नववधू पसार झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात घडली. हे लग्न जमवण्यासाठी एका एजंटने तब्बल सव्वादोन लाख घेतले होते. नववधूने पलायन केल्यानंतर नवरदेवाच्या संतप्त नातेवाइकांनी एजंटला चोप देऊन पैसे परत घेतले. पण पोलिसांमध्ये मात्र या घटनेची अद्याप नोंद घेण्यात आलेली नव्हती.
अंधारी गावातील तरुणासोबत संपर्कातील मुलीशी विवाह लावून देण्यासाठी एजंटने सव्वादोन लाख रुपये घेतले होते. ३१ जुलै रोजी लग्नही झाले. लग्नादरम्यान एका नातेवाइकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने नोंदणी विवाह करण्याची गळ घातली. याला वधूकडील नातेवाइकांनी विरोध केल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी (१ ऑगस्ट) सिल्लोडला जाऊन वर-वधूंची नोटरी करून घेतली. दरम्यान, लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूने दोन तरुणांसोबत दुचाकीवरून पलायन केल्याची माहिती बुधवारी सकाळी उघडकीस आली. फसवणूक झाल्याने संतप्त नातेवाइकांनी एजंटला पकडून सव्वादोन लाख वसूल केले व चांगला चोपही दिल्याचे सांगण्यात आले.
मात्र, एवढा प्रकार घडूनही वधूकडील मंडळी कोणत्या गावाची होती हे समोर आलेले नाही. या प्रकरणाबाबत सिल्लोड ग्रामीण पोलिसांत अद्याप कुणीही तक्रार दिलेली नसल्याने आम्ही याबाबत काहीही सांगू शकत नाही, असे पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी सांगितले.
सर्व नातेवाईक झोपल्यावर वधूचे मध्यरात्री पलायन.
लग्न करून येताना उशीर झाल्याने वर-वधू पळशीत नातेवाइकाकडे थांबले. नववधूला दुसऱ्या दिवशी सासरी नेणार होते. रात्री जेवणानंतर सर्व नातेवाईक झोपले. हीच संधी साधत नववधूने मध्यरात्री पलायन केले.