सातारा:-साताऱ्यात आचारसंहितेमध्ये सुद्धा भय नसल्याने रोकड वाहतुकीची शंका…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात आचारसंहितेमध्ये सुद्धा भय नसल्याने रोकड वाहतुकीची शंका…
सातारा दि: लोकशाही मार्गाने सर्व निवडणुका व्हाव्यात. यासाठी घटनात्मक तरतुदी केलेली आहे .परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त शेषन यांनी सुरुवात केली. तरीही सर्व गोष्टी घडत असल्याचा पुरावा अनेकदा सापडला आहे. आज दुपारी साताऱ्यात चक्क ९५ लाखाची रोकड सापडल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सातारा तहसीलदार
नागेश गायकवाड, उपविभागीय पोलीस
अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे,कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ९५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रशासन अणि पोलीस यांच्या
भरारी पथकाकडून ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे.
सातारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
प्रशासनाकडूनआचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी दक्षता घेतली जात होती. तरीसुद्धा सातारा जिल्ह्यात यापूर्वी टोल नाका व काही भागात आचारसंहिता सुरू असताना रोकड पैशाची वाहतूक निदर्शनास आली होती. ती भरारी पथकाने शोधून काढल्यामुळे खऱ्या अर्थाने आचारसंहिता कडक असल्याचे निदर्शनास आले आहे.
निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची
वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठीभरारी पथके तैनात केली होते . तपासणी
नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात असताना ही रोकड सदरच्या घटनास्थळापर्यंत कशी काय पोहोचली? हे बारकाईने तपासणी गरजेचे बनले आहे.
आज मंगळवारी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी शेंद्रेजवळील
सोनगाव तर्फ येथे एमएच ४८ सीटी ५२३९ या क्रेटा चार चाकी वाहनाची पथकाने
तपासणी केली. यावेळी ९५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर
रक्कम पथकाने पुढील तपासासाठी जप्त केली आहे . ती एका
व्यापाऱ्याची असल्याचे प्रथमदर्शनी तपासात
समजले आहे. याबाबतचा अधिक तपास प्रशासनाकडन करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी आपले व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी व्यापारी वर्ग काही उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. त्याचा आणि या रोकडचा काही संबंध नाही. परंतु ,जनसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागलेली आहे. सातारा जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये आचारसंहितेचे पालन व्हावे. अशी सर्वांचीच मनस्वी इच्छा आहे. यापूर्वी एका मतदार संघामध्ये चक्क अधिकृत उमेदवारांनी भाषण करताना स्पष्ट केले की, तुमच्याकडे पैसे आहेत तर माझ्याकडे काय चीचुक्याचे पोतं नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु आता कडक आचारसंहितेमुळे एक आदर्श निवडणुका म्हणून आता त्याकडे पाहिले जात आहे…………… फोटो जप्त केलेले रोकड व वाहन.